शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरमांड नदीला जलपर्णीने घेरले

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

चाफळमधील स्थिती : अनेक ठिकाणी पाणी साठल्याने धोका

चाफळ : येथील राम मंदिराच्या दक्षिणेकडील ऐतिहासिक घाटावरून वाहणाऱ्या उत्तरमांड नदीला जलपर्णीने वेढा घातला आहे. त्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.महाराष्ट्रकवी यशवंत तथा य. दि. पेंढारकर यांनी या उत्तरमांड नदीवर चिरकाल टिकणारे काव्य करून संपूर्ण महाराष्ट्रभर या नदीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या उत्तरमांड नदीचा श्वास सध्या या जलपर्णीच्या विळख्याने अक्षरश: गुदमरला आहे. पश्चिमेच्या उंच डोंगरकपारीतून उगम पावलेल्या या नदीचे यापूर्वी विशाल रूप होते. या नदीवर पुरातन ब्रिटिशकालीन असलेला ३५ फुटी उंचीचा पादचारी पूल आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. पुलाच्या पूर्वेकडील बाजूस गावात सध्या ये-जा करण्यास ७ फूट उंचीचा दुसरा फरशी पूल आहे. यावरूनच सध्या रहदारी सुरु असते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीवरच कृष्णा खोरे महामंडळाने गमेवाडीनजीक उत्तरमांड मध्यम प्रकल्प उभारला आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह सध्या कमी झाला आहे. गेल्या पाच वर्षांत सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राम मंदिरास तीथक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. मंदिर व परिसरात सुशोभीकरणाची अनेक कामे मार्र्गी लावली. पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून उत्तरमांड नदीच्या दोन्ही बाजूस सुसज्ज घाट बांधण्याचे काम प्रस्तावित होते. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन ती आता आमदार शंभुराज देसाई गटाकडे गेली आहे. विद्यमान सदस्यांनी प्रस्तावित घाट बांधकामासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातनदीपात्राच्या दोन्ही बाजूला गारवेल व इतर जलपर्णीनी वेढा घातला आहे. पाण्याचा खळखळाट सध्या बंद झाल्याने पाण्याचा दुर्गंधीयुक्त साठा झाला आहे. त्यातच ग्रामस्थ, व्यावसायिक केर-कचऱ्यासह प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तू नदीपात्रात टाकत असल्याने पाणी दूषित बनत चालले आहे. नदीपात्रालगतच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आहे. नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी विहिरीत गेल्यास ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चाफळच्या राम देवस्थान क्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी दोन कोटी रूपयांचा निधी मंदिर ट्रस्टला दिला जातो. उत्तरमांड नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यायला हवा. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून ट्रस्टने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावेत.- अंकुश जमदाडे, उपसरपंच, चाफळ