शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उत्तरमांड नदीला जलपर्णीने घेरले

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

चाफळमधील स्थिती : अनेक ठिकाणी पाणी साठल्याने धोका

चाफळ : येथील राम मंदिराच्या दक्षिणेकडील ऐतिहासिक घाटावरून वाहणाऱ्या उत्तरमांड नदीला जलपर्णीने वेढा घातला आहे. त्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.महाराष्ट्रकवी यशवंत तथा य. दि. पेंढारकर यांनी या उत्तरमांड नदीवर चिरकाल टिकणारे काव्य करून संपूर्ण महाराष्ट्रभर या नदीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या उत्तरमांड नदीचा श्वास सध्या या जलपर्णीच्या विळख्याने अक्षरश: गुदमरला आहे. पश्चिमेच्या उंच डोंगरकपारीतून उगम पावलेल्या या नदीचे यापूर्वी विशाल रूप होते. या नदीवर पुरातन ब्रिटिशकालीन असलेला ३५ फुटी उंचीचा पादचारी पूल आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. पुलाच्या पूर्वेकडील बाजूस गावात सध्या ये-जा करण्यास ७ फूट उंचीचा दुसरा फरशी पूल आहे. यावरूनच सध्या रहदारी सुरु असते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीवरच कृष्णा खोरे महामंडळाने गमेवाडीनजीक उत्तरमांड मध्यम प्रकल्प उभारला आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह सध्या कमी झाला आहे. गेल्या पाच वर्षांत सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राम मंदिरास तीथक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. मंदिर व परिसरात सुशोभीकरणाची अनेक कामे मार्र्गी लावली. पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून उत्तरमांड नदीच्या दोन्ही बाजूस सुसज्ज घाट बांधण्याचे काम प्रस्तावित होते. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन ती आता आमदार शंभुराज देसाई गटाकडे गेली आहे. विद्यमान सदस्यांनी प्रस्तावित घाट बांधकामासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातनदीपात्राच्या दोन्ही बाजूला गारवेल व इतर जलपर्णीनी वेढा घातला आहे. पाण्याचा खळखळाट सध्या बंद झाल्याने पाण्याचा दुर्गंधीयुक्त साठा झाला आहे. त्यातच ग्रामस्थ, व्यावसायिक केर-कचऱ्यासह प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तू नदीपात्रात टाकत असल्याने पाणी दूषित बनत चालले आहे. नदीपात्रालगतच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आहे. नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी विहिरीत गेल्यास ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चाफळच्या राम देवस्थान क्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी दोन कोटी रूपयांचा निधी मंदिर ट्रस्टला दिला जातो. उत्तरमांड नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यायला हवा. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून ट्रस्टने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावेत.- अंकुश जमदाडे, उपसरपंच, चाफळ