शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

कोरोनाने घेरले.. मोफत धान्याने तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना कुटुंब कसे चालवायचे? ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न पडला. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शासनाने दिलेल्या मोफत धान्याने गोरगरिबांना तारले आहे. जिल्ह्यातील १६ लाख ७६ हजार ६१६ लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने देखील तसा निर्णय घेतला असल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरीब जनतेच्या हाताला काम राहिलेले नाही. मजुरी थांबली तसा पैसा येणे बंद झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे जमणार नसल्याने गरीब जनता चिंतेत होती. या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय संजीवनी ठरलेला आहे.

जिल्ह्यात मे महिन्याकरिता अंत्योदय अन्न योजना प्रतिकार्ड २५ किलो गहू, १० किलो तांदूळ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रति माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून ५ हजार ८२७ मेट्रिक टन गहू व ३ हजार ६९२ मेट्रिक टन तांदूळ मोफत वितरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये अन्नधान्य याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रति सदस्य ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिमा पाच किलोप्रमाणे मे महिन्याकरिता मोफत ४७२२ मेट्रिक टन गहू व २८७८ मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध झाला आहे. त्याचे वितरण सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

दरम्यान, जून महिन्याकरिता अंत्योदय अन्न योजना प्रति कार्ड २५ किलो गहू व दहा किलो तांदूळ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रतिमानसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून ५२२२ मेट्रिक टन गहू व रुपये दोन किलो दोन रुपये प्रति किलो या दराने, तर ३ हजार ३९५ मेट्रिक टन तांदूळ ३ रुपये प्रति किलो या दराने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत असलेल्या लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना सदस्य तीन किलो गहू दोन किलो तांदूळ याप्रमाणे प्रति किलोप्रमाणे जून महिन्याकरिता मोफत ५ हजार ४२७ मेट्रिक टन गहू व ३६१८ मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील लाभ लाभार्थी २८२१०

प्राधान्य कुटुंब लाभार्थी १६७६६१६

कोट..

केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गहू, तांदूळ या वस्तू मिळत आहेत. जिल्ह्यातील कुठलेही कुटुंब या लाभापासून वंचित राहणार नाही.

- स्नेहा किसवे - देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी