शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कोरोनाने घेरले.. मोफत धान्याने तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना कुटुंब कसे चालवायचे? ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न पडला. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शासनाने दिलेल्या मोफत धान्याने गोरगरिबांना तारले आहे. जिल्ह्यातील १६ लाख ७६ हजार ६१६ लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने देखील तसा निर्णय घेतला असल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरीब जनतेच्या हाताला काम राहिलेले नाही. मजुरी थांबली तसा पैसा येणे बंद झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे जमणार नसल्याने गरीब जनता चिंतेत होती. या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय संजीवनी ठरलेला आहे.

जिल्ह्यात मे महिन्याकरिता अंत्योदय अन्न योजना प्रतिकार्ड २५ किलो गहू, १० किलो तांदूळ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रति माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून ५ हजार ८२७ मेट्रिक टन गहू व ३ हजार ६९२ मेट्रिक टन तांदूळ मोफत वितरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये अन्नधान्य याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रति सदस्य ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिमा पाच किलोप्रमाणे मे महिन्याकरिता मोफत ४७२२ मेट्रिक टन गहू व २८७८ मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध झाला आहे. त्याचे वितरण सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

दरम्यान, जून महिन्याकरिता अंत्योदय अन्न योजना प्रति कार्ड २५ किलो गहू व दहा किलो तांदूळ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रतिमानसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून ५२२२ मेट्रिक टन गहू व रुपये दोन किलो दोन रुपये प्रति किलो या दराने, तर ३ हजार ३९५ मेट्रिक टन तांदूळ ३ रुपये प्रति किलो या दराने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत असलेल्या लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना सदस्य तीन किलो गहू दोन किलो तांदूळ याप्रमाणे प्रति किलोप्रमाणे जून महिन्याकरिता मोफत ५ हजार ४२७ मेट्रिक टन गहू व ३६१८ मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील लाभ लाभार्थी २८२१०

प्राधान्य कुटुंब लाभार्थी १६७६६१६

कोट..

केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गहू, तांदूळ या वस्तू मिळत आहेत. जिल्ह्यातील कुठलेही कुटुंब या लाभापासून वंचित राहणार नाही.

- स्नेहा किसवे - देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी