शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

वाहनांच्या कंपनाने झुलतोय सुरूरचा उड्डाणपूल

By admin | Updated: March 10, 2017 22:55 IST

तात्पुरती मलमपट्टी : नऊ महिन्यांनंतरही परिस्थिती ‘जैसे-थे’; वाहनचालकांतून संताप

कवठे : सुरूर, ता. वाई येथील उड्डाणपुलाला ५ जून २०१६ रोजी भगदाड पडले व पुलाचा कमकुवत भाग हादरू लागला. विशेष म्हणजे बांधकाम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा पूल अंदाजे तीन महिनेच सुरू होता व लगेचच पुलास भगदाड पडले. सध्या या ठिकाणाहून वाहतूक बंद ठेवण्यात आली असली तरी ज्या ठिकाणी खड्डा पडला आहे, त्या भागाची नऊ महिने झाले तरी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वाहनांच्या कंपनाने या पुलाला हादरे बसत आहेत.पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. सुरूर येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असले तरी या उड्डाणपुलामुुळे समस्याही उद्भवल्या आहेत. वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर या पुलाला गेल्या वर्षी ५ जून रोजी भगदाड पडले. याबाबतचे वृत्त दि. ६ जून २०१६ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुलावरील खड्डा तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करण्यात आला. पुन्हा वाहतूक सुरू केल्यानंतर पुलाचा खचलेला भाग हादरू लागला व त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात डांबराचे पिंप लावून खचलेल्या भागावरून वाहतूक बंद करण्यात आली.आज जवळजवळ या घटनेला नऊ महिने इतका कालावधी उलटला तरी या कामाबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नसून आजसुद्धा पुलाच्या या खचलेल्या भागावर उभे राहिले असता शेजारून अवजड वाहन गेल्यास संपूर्ण पूल हादरत आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे इशारे दिले तरीसुद्धा महामार्ग प्राधिकरण कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)डांबरी पिंप ठरताहेत अपघाताचे कारणदुहेरी वाहतुकीने निम्मा उड्डाणपूल चढून आल्यावर अचानक समोर मोठा खड्डा दिसतो. डांबरी पिंप पाहून वाहनधारकांची फसगत होते. वाहन वळवताना डाव्या बाजूच्या वाहनचालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. डांबरी पिंपास वाहन धडकून अपघात होत आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे. पुलाच्या बंद भागामध्ये मातीचे ढीग, अपघातग्रस्त वाहनांच्या काचा व तुटलेले भाग विखुरलेले आहेत.पुलाखालून जाताना नागरिकांना पुलाच्या निकृष्ट कामामुळे भीती वाटत असून, पुलावरून प्रवास करताना भरधाव वेग व अचानक तीन लेनचे निम्म्याच लेनमध्ये रूपांतर झाल्याने दुचाकी व लहान वाहने अपघातग्रस्त होत आहेत. किरकोळ स्वरूपाचे अपघात झाल्याने नुकसान भरपाई मागायची कोणाकडे, हा प्रश्न आहे.- राजेश चव्हाण, वकील, सुरूर, ता. वाईउड्डाणपुलावर ज्या ठिकाणी भाग खचला आहे त्या ठिकाणी पुलाच्या खालच्या बाजूला लोखंडी बॉक्स व पोत्यांची बारदाने वापरून पुलाखालचा भाग दुरुस्त करून बंदिस्त केला आहे. पुलास हादरे बसत असल्याने पुलाखाली कोणतीही वाहने लावली जाऊ नयेत किंवा पादचाऱ्यांनी या भागातून जाताना अपघात होऊ नये यासाठी काळजी घेतल्याचे जाणवते.