शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

पोलिसांच्या निर्भय पथकाला साथ द्या

By admin | Updated: August 16, 2016 23:00 IST

उर्मिला मातोंडकर : पन्नास महिलांचं निर्भया पथक झालं कार्यरत; सातारकरांमधून पथकाचं उत्स्फूर्त स्वागत

सातारा: ‘कोणत्याही योजनेच यश हे नागरिकांच्या योगदानावर असते. महिलांची असुरक्षितता हा गंभीर प्रश्न असून, त्यासाठी निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलिसांनी फार मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांना प्रत्येक नागरिकाने तसेच महिलांनी साथ द्यावी,’ असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित निर्भया पथकाचे उद्घाटन पोलिस करमणूक केंद्रात झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, माणदेशी फाउंडेशनच्या डॉ. चेतना सिन्हा, चित्रलेखा माने-कदम, वैशाली चव्हाण, प्रियांका पाटील आदी उपस्थित होत्या.उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘कर्तृत्व, विचार आणि आयुष्यात काही करायचे भान असणे आवश्यक आहे. निर्भया पथक सुरू होत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. स्त्रिया खूप काही करू शकतात. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खूप कमी भेदभाव आहे. स्त्रियांना अनेक संधी आहेत. ग्रामीण भागात छेडछाड झालेल्या मुली तक्रार देण्यास घाबरतात. त्यांना निर्भया पथक आधारस्तंभ ठरणार आहे. प्रत्येक योजनेचे यश हे नागरिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. त्यामुळे आता प्रत्येक महिलेवर मोठी जबाबदारी असून, पोलिसांनी आपल्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे त्याला सर्व महिलांना साथ द्यावी.’नागरिकांनीही एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे. आपण काय करू शकतो ते केले पाहिजे. सबला नसणाऱ्या महिलांमध्ये जागृती केली पाहिजे, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. माझे पाचगणीत घर असल्याने एक प्रकारे मीही सातारावासीयच आहे. संपूर्ण जग फिरल्यानंतर साताऱ्याला येण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘निर्भया पथक म्हणजे प्रतिबंधात्मक पोलिसिंगच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. समाजात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अत्याचाराची घटनाच घडू नये यासाठी या पथकाचे मोठे योगदान राहणार आहे.’पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ‘या पथकाच्या कामकाजाची माहिती देत सायबर सेल सुरू झाल्याने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीलाही आळा बसणार आहे. प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती, विद्यालय, महाविद्यालयात विद्यार्थिनी सुरक्षा समिती तसेच तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची दखल पोलिस विभागामार्फत घेतली जाणार असून, दोषींवर कारवाई केली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस हवालदार अनिल पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर शहरातून निर्भया रॅलीही काढण्यात आली. (प्रतिनिधी)महिलांना निर्भय बनविणे सर्वांची जबाबदारीकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘महिलेला आदराचे स्थान आहे परंतु आताच्या काळात तिला निर्भय बनवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्यावेळेस समाजात पोलिस नसताना महिलेला सुरक्षित वाटेल, छेडछाड करणाऱ्यांना वचक बसणारे वातावरण तयार होईल त्यावेळेस हा प्रकल्प यशस्वी झाला असे म्हणता येईल.’