शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शेतकऱ्यांच्या मागण्यांना अंनिसचा पाठिंबा

By admin | Updated: June 10, 2017 13:45 IST

वाईत राज्यस्तरीय परिषद : जवाब दो आंदोलन २0 जुलैपासून

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १0 : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना महाराष्ट्र अंनिसने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करण्यात आले असून, महाराष्ट्र अंनिसचे २०२५ ध्येयनिश्चितीच्या आखणीबाबतचे नियोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यस्तरीय विस्तारीत कार्यकारिणी बैठक वाई, जि. सातारा येथे दि. २, ३, ४ जून २०१७ रोजी संपन्न झाली. त्यामध्ये सद्या सुरु असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणी आंदोलनाला आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतकरी वगार्तील निराशा व संताप दूर करण्यासाठी सरकारकडून संवाद प्रक्रिया जारी ठेवून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे, अशी भूमिका अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र अंनिसच्या वाई येथील विस्तारीत राज्य कार्यकारिणी बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी संघटीत कार्याच्या वाटचाली त२०२५ वर्षापर्यंत करावयाच्या ध्येय निश्चितीसाठी चर्चा करण्यात आली.शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे व प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासातील पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणि सरकारला उत्तरदायी व्हायला भाग पाडण्यासाठी जवाब दो आंदोलन येत्या २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात राबविणार आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ सहकारी कुमार मंडपे (सातारा), प्रा. प. रा. आर्डे (सांगली) आणि शालिनीताई ओक (सोलापूर) या उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा दृकश्राव स्वरुपातील सदिच्छा संदेश दाखविण्यात आला. विस्तारीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे संयोजन महाराष्ट्र अंनिसच्या वाई शाखेच्या पुढाकाराने करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार आणि सातारा जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप डोंबिवलीकर, जिल्हा प्रधान सचिव चंद्रहार माने, वाई शाखा अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनात अडीच दिवसीय विस्तारीत राज्य कार्यकारिणीचे यशस्वी संयोजन केले.