शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अंधश्रद्धेमुळे तरुण मुलीचा गेला जीव; तर अनेक झाले कंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

सागर गुजर सातारा : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. दहिवडी ...

सागर गुजर

सातारा : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. दहिवडी येथील तरुण मुलीचा जीव गेला, तर अनेकजणांनी मांत्रिकाच्या भूलथापांना फसून पैसा जमीन-जुमला गमावला आहे.

२१ व्या शतकातदेखील लोकांच्या वैज्ञानिक जाणिवा तसेच विवेकवाद आणि निर्भयपणा जागृत होत नाही. भीतीपोटी अवसान गाळून बसणारे लोक मांत्रिकांच्या भूलथापांना फसत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र अशा बुवांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. जादू-टोणाविरोधी कायद्यामुळे अंनिसच्या या कार्याला बळ मिळाले आहे. तरीही लोकांनी निर्भयपणे फसवणुकीबाबत तक्रार करणे आवश्यक आहे.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) २०१३मध्ये झाला कायदा

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २६ ऑगस्ट २०१३ पासून राज्यात अंमलात आला. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून हा कायदा लागू झाला आहे.

२) आठ वर्षांत ७५ गुन्हे दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जादू-टोणाविरोधी कायद्याअंतर्गत संपूर्ण राज्यभरात ७५ गुन्हे गेल्या आठ वर्षांमध्ये दाखल केले आहेत. सातारा जिल्ह्यातदेखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुवाबाजी करणाऱ्या लोकांवर वचक ठेवला आहे.

३) भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे

१ ) अंधश्रद्धेमुळे दहिवडी येथील चौदा वर्षांच्या मुलीला नाहक जीव गमवावा लागला. या मुलीचे पालक तिला घेऊन दोन मांत्रिकाकडे गेले होते. अमावास्येच्या रात्री बारा वाजता या मुलीवर बसलेले भूत उतरेल, असं या मांत्रिकाने सांगितलं होतं, त्यामुळे घरातील लोक या मुलीभोवती रिंगण करून बसले होते. तिथेच तिने प्राण सोडला. वास्तविक या मुलीला निमोनिया झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख आहे. योग्यवेळी उपचार न झाल्याने या मुलीला प्राण गमवावे लागले.

२) खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे एक मांत्रिक भूतबाधा काढतो, असा बनाव करत होता. तब्बल १३ वर्षे लोकांची फसवणूक सुरू होती. भूतबाधा उतरवतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेणे, अन्नदान करून घेणे, अशी फसवणूक करत होता. उपअधीक्षक धीरज घाडगे यांच्या सहकार्याने अंनिसने मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला.

४) अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्याचा कोट

महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा झाला, त्यासाठी डॉ. दाभोलकर यांना प्राण गमवावे लागले. लोकांमध्ये वैज्ञानिक विचारांचा अभाव असल्यामुळे मांत्रिक लोक लाभ घेतात. कुठेही अशाप्रकारचा अनुचित प्रकार घडत असेल, तर त्याची माहिती लोकांनी निर्भयपणे अंनिसला दिली पाहिजे. अनिस जी लागेल ती कायदेशीर मदत करेल.

- प्रशांत पोतदार, राज्य कार्यकारिणी सदस्य, अंनिस