शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

साडेसतरा लाखांचा ऊस खाक

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

चौधरवाडीतील घटना : वीजवाहक तार तुटून पडल्याने भडकली आग

फलटण : चौधरवाडी, ता. फलटण गावाजवळ उसाच्या क्षेत्रावरुन जाणारी वीजवाहक तार तुटून खाली पडल्याने सुमारे १० ते १२ एकर क्षेत्रातील उभा ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे ६ शेतकऱ्यांचे सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल यंत्रणेने पंचनाम्याद्वारे व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरवाडी-खुंटे रस्त्यावरील तुकाराम कृष्णाजी पिसाळ व सुमन तुकाराम पिसाळ यांच्या सर्व्हे नं १८/६/१ या जमिनीतील उभ्या उसाच्या पिकात वीजवितरण कंपनीची वीजवाहक तार तुटून आज (सोमवार) दुपारी दीडच्या सुमारास खाली पडली आणि वीजप्रवाहामुळे उसाच्या पिकाने पेट घेतला. त्यामध्ये पिसाळ यांचा १ हेक्टर ४० आर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. त्याचबरोबर या क्षेत्रात ठिबक सिंंचन यंत्रणा बसविण्यात आली असल्याने उसाच्या पिकाबरोबर ही यंत्रणाही जळून खाक झाली. पिसाळ यांच्या उसपिकाचे ५ लाख ५० हजार आणि ठिबक सिंंचन यंत्रणेचे १ लाख ५० हजार असे एकूण सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करुन गावकामगार तलाठ्यांनी तसा पंचनामा केला आहे. तुकाराम पिसाळ यांच्या शेजारी असलेले योगेश कृष्णाथ नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, कृष्णाथ गोविंंद नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, सुमन वसंत पवार यांचा ८० आर क्षेत्रातील, पकुर्डी तरंग भोसले यांचा ३० आर क्षेत्रातील, सुधाकर सोनबा डेंगे यांचा ४० आर क्षेत्रातील उभा ऊस या आगीने जळून भस्मसात झाला असून त्यामध्ये योगेश नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, कृष्णाथ नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, सुमन पवार यांचे २ लाख २५ हजार रुपयांचे, पकुर्डी भोसले यांचे ८५ हजार रुपयांचे, सुधाकर डेंगे यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. वीजवितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)मोठे क्षेत्र कौशल्याने वाचविलेवीजपुरवठा खंडित झाल्याने आग विझविण्यासाठी पाणी उपसा करता आला नाही. तथापि, लगतच्या क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचविण्यासाठी शेजारच्या क्षेत्रात उसतोड सुरू असल्याने तोडणी मजुरांची टोळी आणून लगतच्या उसाच्या क्षेत्रात आग पसरणार नाही यासाठी काही क्षेत्रातील उस तोडून बाजूला करण्यात आला. त्यामुळे मोठे क्षेत्र आगीपासून वाचविण्यात यश आले.