शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

साडेसतरा लाखांचा ऊस खाक

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

चौधरवाडीतील घटना : वीजवाहक तार तुटून पडल्याने भडकली आग

फलटण : चौधरवाडी, ता. फलटण गावाजवळ उसाच्या क्षेत्रावरुन जाणारी वीजवाहक तार तुटून खाली पडल्याने सुमारे १० ते १२ एकर क्षेत्रातील उभा ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे ६ शेतकऱ्यांचे सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल यंत्रणेने पंचनाम्याद्वारे व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरवाडी-खुंटे रस्त्यावरील तुकाराम कृष्णाजी पिसाळ व सुमन तुकाराम पिसाळ यांच्या सर्व्हे नं १८/६/१ या जमिनीतील उभ्या उसाच्या पिकात वीजवितरण कंपनीची वीजवाहक तार तुटून आज (सोमवार) दुपारी दीडच्या सुमारास खाली पडली आणि वीजप्रवाहामुळे उसाच्या पिकाने पेट घेतला. त्यामध्ये पिसाळ यांचा १ हेक्टर ४० आर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. त्याचबरोबर या क्षेत्रात ठिबक सिंंचन यंत्रणा बसविण्यात आली असल्याने उसाच्या पिकाबरोबर ही यंत्रणाही जळून खाक झाली. पिसाळ यांच्या उसपिकाचे ५ लाख ५० हजार आणि ठिबक सिंंचन यंत्रणेचे १ लाख ५० हजार असे एकूण सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करुन गावकामगार तलाठ्यांनी तसा पंचनामा केला आहे. तुकाराम पिसाळ यांच्या शेजारी असलेले योगेश कृष्णाथ नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, कृष्णाथ गोविंंद नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, सुमन वसंत पवार यांचा ८० आर क्षेत्रातील, पकुर्डी तरंग भोसले यांचा ३० आर क्षेत्रातील, सुधाकर सोनबा डेंगे यांचा ४० आर क्षेत्रातील उभा ऊस या आगीने जळून भस्मसात झाला असून त्यामध्ये योगेश नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, कृष्णाथ नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, सुमन पवार यांचे २ लाख २५ हजार रुपयांचे, पकुर्डी भोसले यांचे ८५ हजार रुपयांचे, सुधाकर डेंगे यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. वीजवितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)मोठे क्षेत्र कौशल्याने वाचविलेवीजपुरवठा खंडित झाल्याने आग विझविण्यासाठी पाणी उपसा करता आला नाही. तथापि, लगतच्या क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचविण्यासाठी शेजारच्या क्षेत्रात उसतोड सुरू असल्याने तोडणी मजुरांची टोळी आणून लगतच्या उसाच्या क्षेत्रात आग पसरणार नाही यासाठी काही क्षेत्रातील उस तोडून बाजूला करण्यात आला. त्यामुळे मोठे क्षेत्र आगीपासून वाचविण्यात यश आले.