शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

साडेसतरा लाखांचा ऊस खाक

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

चौधरवाडीतील घटना : वीजवाहक तार तुटून पडल्याने भडकली आग

फलटण : चौधरवाडी, ता. फलटण गावाजवळ उसाच्या क्षेत्रावरुन जाणारी वीजवाहक तार तुटून खाली पडल्याने सुमारे १० ते १२ एकर क्षेत्रातील उभा ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे ६ शेतकऱ्यांचे सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल यंत्रणेने पंचनाम्याद्वारे व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरवाडी-खुंटे रस्त्यावरील तुकाराम कृष्णाजी पिसाळ व सुमन तुकाराम पिसाळ यांच्या सर्व्हे नं १८/६/१ या जमिनीतील उभ्या उसाच्या पिकात वीजवितरण कंपनीची वीजवाहक तार तुटून आज (सोमवार) दुपारी दीडच्या सुमारास खाली पडली आणि वीजप्रवाहामुळे उसाच्या पिकाने पेट घेतला. त्यामध्ये पिसाळ यांचा १ हेक्टर ४० आर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. त्याचबरोबर या क्षेत्रात ठिबक सिंंचन यंत्रणा बसविण्यात आली असल्याने उसाच्या पिकाबरोबर ही यंत्रणाही जळून खाक झाली. पिसाळ यांच्या उसपिकाचे ५ लाख ५० हजार आणि ठिबक सिंंचन यंत्रणेचे १ लाख ५० हजार असे एकूण सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करुन गावकामगार तलाठ्यांनी तसा पंचनामा केला आहे. तुकाराम पिसाळ यांच्या शेजारी असलेले योगेश कृष्णाथ नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, कृष्णाथ गोविंंद नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, सुमन वसंत पवार यांचा ८० आर क्षेत्रातील, पकुर्डी तरंग भोसले यांचा ३० आर क्षेत्रातील, सुधाकर सोनबा डेंगे यांचा ४० आर क्षेत्रातील उभा ऊस या आगीने जळून भस्मसात झाला असून त्यामध्ये योगेश नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, कृष्णाथ नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, सुमन पवार यांचे २ लाख २५ हजार रुपयांचे, पकुर्डी भोसले यांचे ८५ हजार रुपयांचे, सुधाकर डेंगे यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. वीजवितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)मोठे क्षेत्र कौशल्याने वाचविलेवीजपुरवठा खंडित झाल्याने आग विझविण्यासाठी पाणी उपसा करता आला नाही. तथापि, लगतच्या क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचविण्यासाठी शेजारच्या क्षेत्रात उसतोड सुरू असल्याने तोडणी मजुरांची टोळी आणून लगतच्या उसाच्या क्षेत्रात आग पसरणार नाही यासाठी काही क्षेत्रातील उस तोडून बाजूला करण्यात आला. त्यामुळे मोठे क्षेत्र आगीपासून वाचविण्यात यश आले.