शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता तरी जागे व्हावे : गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

पुसेगाव : ‘शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केल्यापासून चौदा दिवसांमध्ये ऊसाची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सक्तीचे होते. ...

पुसेगाव : ‘शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केल्यापासून चौदा दिवसांमध्ये ऊसाची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सक्तीचे होते. अन्यथा कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत होता. विलंब झालेल्या दिवसांचे अठरा टक्के व्याज दराने द्यावे लागत होते, हा कायदा रद्द करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार व राज्यसरकार करीत आहे. शेतकऱ्यांनी आता तरी जावे व्हावे,’ असे आवाहन महाराष्ट्र शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी केले.

गोडसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाने संबंधित कायदा रद्द केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कवच कुंडलेच काढून घेण्यात आली आहेत. आता ऊसाचे बिल दिले नाही किंवा अन्य कारणास्तव शेतकऱ्यांना संबंधित कारखान्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. १९८० मध्ये शरद जोशी यांनी दीडशेवरून तीनशे रुपयांची मागणी केली. त्यामुळे सर्व साखर कारखानदार व राज्यकर्ते, शेतकरी संघटनेला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानू लागले. पण आंदोलनाचा रेटा व त्यातील मागणी केल्याने सत्तर टक्के लेव्ही कमी केली.

दौंड येथे पहिली ऊस परिषद घेतली. तेव्हापासून ऊसाला एसएमपी शुगर केन कंट्रोल १९६६ नुसार १४ दिवसांत रक्कम मिळाली. पहिली उचल ७५० या मागणीवरून ३१०० रुपये ते ३४०० दर मिळाली. त्यावेळी कोल्हापूरचे साखर उपायुक्त कार्यालय पेटवून दिले. वरवंड येथे बबनराव पाचपुते यांना घेराव आंदोलनात हजारो कार्यकत्यांवर गुन्हे दाखल झाले. या सगळ्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन ३४०० रुपये दर मिळाला होता. सध्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणाऱ्या ऊस शेतीबाबतचा कायदा रद्द करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळेशेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.