शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता तरी जागे व्हावे : गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST

पुसेगाव : ‘शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केल्यापासून चौदा दिवसांमध्ये ऊसाची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सक्तीचे होते. ...

पुसेगाव : ‘शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केल्यापासून चौदा दिवसांमध्ये ऊसाची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सक्तीचे होते. अन्यथा कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत होता. विलंब झालेल्या दिवसांचे अठरा टक्के व्याज दराने द्यावे लागत होते, हा कायदा रद्द करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार व राज्यसरकार करीत आहे. शेतकऱ्यांनी आता तरी जावे व्हावे,’ असे आवाहन महाराष्ट्र शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी केले.

गोडसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाने संबंधित कायदा रद्द केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कवच कुंडलेच काढून घेण्यात आली आहेत. आता ऊसाचे बिल दिले नाही किंवा अन्य कारणास्तव शेतकऱ्यांना संबंधित कारखान्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. १९८० मध्ये शरद जोशी यांनी दीडशेवरून तीनशे रुपयांची मागणी केली. त्यामुळे सर्व साखर कारखानदार व राज्यकर्ते, शेतकरी संघटनेला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानू लागले. पण आंदोलनाचा रेटा व त्यातील मागणी केल्याने सत्तर टक्के लेव्ही कमी केली.

दौंड येथे पहिली ऊस परिषद घेतली. तेव्हापासून ऊसाला एसएमपी शुगर केन कंट्रोल १९६६ नुसार १४ दिवसांत रक्कम मिळाली. पहिली उचल ७५० या मागणीवरून ३१०० रुपये ते ३४०० दर मिळाली. त्यावेळी कोल्हापूरचे साखर उपायुक्त कार्यालय पेटवून दिले. वरवंड येथे बबनराव पाचपुते यांना घेराव आंदोलनात हजारो कार्यकत्यांवर गुन्हे दाखल झाले. या सगळ्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन ३४०० रुपये दर मिळाला होता. सध्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणाऱ्या ऊस शेतीबाबतचा कायदा रद्द करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळेशेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.