शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
6
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
7
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
8
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
9
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
10
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
11
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
12
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
13
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
14
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
15
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
16
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
17
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
18
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
19
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
20
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता तरी जागे व्हावे : गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST

पुसेगाव : ‘शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केल्यापासून चौदा दिवसांमध्ये ऊसाची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सक्तीचे होते. ...

पुसेगाव : ‘शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केल्यापासून चौदा दिवसांमध्ये ऊसाची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे सक्तीचे होते. अन्यथा कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत होता. विलंब झालेल्या दिवसांचे अठरा टक्के व्याज दराने द्यावे लागत होते, हा कायदा रद्द करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार व राज्यसरकार करीत आहे. शेतकऱ्यांनी आता तरी जावे व्हावे,’ असे आवाहन महाराष्ट्र शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी केले.

गोडसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाने संबंधित कायदा रद्द केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कवच कुंडलेच काढून घेण्यात आली आहेत. आता ऊसाचे बिल दिले नाही किंवा अन्य कारणास्तव शेतकऱ्यांना संबंधित कारखान्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. १९८० मध्ये शरद जोशी यांनी दीडशेवरून तीनशे रुपयांची मागणी केली. त्यामुळे सर्व साखर कारखानदार व राज्यकर्ते, शेतकरी संघटनेला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानू लागले. पण आंदोलनाचा रेटा व त्यातील मागणी केल्याने सत्तर टक्के लेव्ही कमी केली.

दौंड येथे पहिली ऊस परिषद घेतली. तेव्हापासून ऊसाला एसएमपी शुगर केन कंट्रोल १९६६ नुसार १४ दिवसांत रक्कम मिळाली. पहिली उचल ७५० या मागणीवरून ३१०० रुपये ते ३४०० दर मिळाली. त्यावेळी कोल्हापूरचे साखर उपायुक्त कार्यालय पेटवून दिले. वरवंड येथे बबनराव पाचपुते यांना घेराव आंदोलनात हजारो कार्यकत्यांवर गुन्हे दाखल झाले. या सगळ्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन ३४०० रुपये दर मिळाला होता. सध्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणाऱ्या ऊस शेतीबाबतचा कायदा रद्द करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळेशेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.