शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऊस उत्पादकांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 30, 2015 00:10 IST

रणजित नाईक-निंबाळकर : नीरा खोऱ्यात ‘लोकनेते’कडून सर्वाधिक दर

फलटण : नीरा खोऱ्यातील साखरपट्ट्यामध्ये ऊसदराची जोरदार स्पर्धा सुरू असून लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने त्यांच्या चाचणी हंगामात गाळपास आलेल्या तालुक्यातील उसाला २२६१ रुपये दर दिला आहे. ऊसदराच्या या स्पर्धेमुळे ऊस उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. नीरा खोऱ्यात सर्वाधिक दर देणारा हा कारखाना ठरला आहे.फलटण तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन होत असून तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांना ऊस देऊन मुबलक प्रमाणात राहणारा ऊस तालुक्याबाहेरील कारखान्यांकडे जात होता. बाहेरील कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तसेच दुष्काळी पट्ट्यातील जनतेचे जीवनमान उंचावून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी दुष्काळी व डोंगराळ उपळवे (ता. फलटण) येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी केली. याच्या गळीत चाचणी हंगामात आलेल्या उसाला पहिला हप्ता १९०१ रुपये आपण दिला. दुसरा हप्ता ३६० रुपये असा एकूण २२६१ रुपये दर आपण तालुक्यातील ऊस उत्पादकांना देत असल्याचे कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी सांगितले. चालू हंगामातही आपण स्पर्धात्मक दर देणार असून कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन दि. १४ आॅक्टोबर रोजी व पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि. १६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्याचवेळी कारखान्याच्या १९.५ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभही करणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५००० मे. टन असून या हंगामात ७ ते ८ लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील ऊस उत्पादकांनी ऊसदराची चिंता करू नये, असे आवाहन रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक दराने ऊसदराची स्पर्धा नीरा खोऱ्यामध्ये माळेगाव, सोमेश्वर यासारखे मोठे कारखाने असताना आजारी श्रीराम साखर कारखान्याने सर्वाधिक २२०७ रुपये दर दिला होता. आता यात लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने २२६१ रुपये दर जाहीर केल्याने साखरपट्ट्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सने १८०० रुपये दर दिला आहे. त्यामुळे तो आता किती दर जाहीर करतोय, तसेच श्रीराम आणखी जादा दर वाढवून देणार का, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. ऊसदराची स्पर्धा ऊस उत्पादकांना फायदेशीर ठरत आहे.इतरांपेक्षा जादा दर देणार : रणजितसिंह लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याकडे येत्या हंगामात गाळपास येणाऱ्या फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या उसाला इतर कारखान्यापेक्षा जास्त दर आपण देणार आहोत. तालुक्यातील ऊस उत्पादकांना अच्छे दिन आणण्याचा दिलेला शब्द आपण पाळत आहोत, असे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.