शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

ऊस गाळप झाला; दराचा प्रश्न सुटेना

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

शेतकरी संभ्रमात : स्वाभिमानीचं ऊसदराबाबत मौन

वाठार स्टेशन : दसरा-दिवाळीत कारखान्याच्या चिमन्या पेटल्या की सर्वांनाच वेध लागायचे ते चालू हंगामातील उसाच्या दराचे, यासाठी नेहमीच संघर्ष करणाऱ्या शेतकरी संघटना आणि त्यानंतर होणारी हिंसक आंदोलने यात नुकसान व्हायचं ; परंतु ऊसदर निश्चित होऊन प्रश्न तरी सुटायचा, मात्र चालू वर्षी यातलं काहीच घडलं नाही. ना आंदोलन, ना ऊसदर? त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी दुप्पट गाळप करण्याचे काम राज्यातील १४० कारखान्यांनी केले आणि जवळपास ८५ लाख मे टन ऊस संपला.गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातच आंदोलनाचा मुहूर्त साधला; पण जाहीर केलेला दर देण्यास सातारा जिल्ह्यातील अनेकांनाच विसर पडला. काहींनी भविष्यातील निवडणुका डोळ्यांपुढे ठेवत दर दिला; परंतु अजूनही निम्याहून अधिक कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या उसाचा दुसरा हप्ता देखील दिला नाही.’१ नोव्हेंबर पासून कारखान्यांनी गाळपाचा शुभारंभ केला. मात्र, ऊसदर कोणत्याही कारखान्याने निश्चित केला नाही. तर केंद्र शासनाने गतवर्षीच्या तुलनेत शंभराची एक नोट वाढवली आणि २,२०० रुपये एफआरपी जाहीर केली.प्रत्यक्षात मात्र एक एकर उसाचा खर्च काय येतो, याचं गांभीर्य देखील नसल्याने आणि कारखानदारीवर कुठंही अंकुश नसल्याने कारवाई करण्याचे निर्णय साखर आयुक्तांनी घेतला. २२०० ते २५०० पर्यंत एफआरपी रक्कम होत असली तरी यातूनच तोडणी वाहतूक खर्च वजा करता १७०० ते १८०० रुपये ऐवढाच दर देणे शक्य असल्याचे मत साखर कारखानदार करीत आहेत. त्यामुळे गतवर्षीचे दर देखील मिळणार का? याबाबत शेतकऱ्यांतून संभ्रम व्यक्त होत आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसण्याचे काम ज्यांना शेतकऱ्यांच्या जीवावर यश मिळालं, त्या स्वाभिमानीनच शेतकऱ्याकडे राजकीय स्वार्थापोटी माघार घेतल्याची चर्चा आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे मिळेल तो दर पदरात पाडून घेण्याचीच भूमिका शेतकऱ्यांनी घेत कारखान्यांच्या ऊस तोडणीस मूक संमती दिली आहे. राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक ऊसदर समिती नेमून केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केल्याची चर्चा रंगू लागली आहे. ऊसदराचे धोरण साखरसम्राटांनी पुढाकार घेऊन सोडविणे आता गरजेचे बनले आहे.