शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

ऊस गाळप झाला; दराचा प्रश्न सुटेना

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

शेतकरी संभ्रमात : स्वाभिमानीचं ऊसदराबाबत मौन

वाठार स्टेशन : दसरा-दिवाळीत कारखान्याच्या चिमन्या पेटल्या की सर्वांनाच वेध लागायचे ते चालू हंगामातील उसाच्या दराचे, यासाठी नेहमीच संघर्ष करणाऱ्या शेतकरी संघटना आणि त्यानंतर होणारी हिंसक आंदोलने यात नुकसान व्हायचं ; परंतु ऊसदर निश्चित होऊन प्रश्न तरी सुटायचा, मात्र चालू वर्षी यातलं काहीच घडलं नाही. ना आंदोलन, ना ऊसदर? त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी दुप्पट गाळप करण्याचे काम राज्यातील १४० कारखान्यांनी केले आणि जवळपास ८५ लाख मे टन ऊस संपला.गतवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातच आंदोलनाचा मुहूर्त साधला; पण जाहीर केलेला दर देण्यास सातारा जिल्ह्यातील अनेकांनाच विसर पडला. काहींनी भविष्यातील निवडणुका डोळ्यांपुढे ठेवत दर दिला; परंतु अजूनही निम्याहून अधिक कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या उसाचा दुसरा हप्ता देखील दिला नाही.’१ नोव्हेंबर पासून कारखान्यांनी गाळपाचा शुभारंभ केला. मात्र, ऊसदर कोणत्याही कारखान्याने निश्चित केला नाही. तर केंद्र शासनाने गतवर्षीच्या तुलनेत शंभराची एक नोट वाढवली आणि २,२०० रुपये एफआरपी जाहीर केली.प्रत्यक्षात मात्र एक एकर उसाचा खर्च काय येतो, याचं गांभीर्य देखील नसल्याने आणि कारखानदारीवर कुठंही अंकुश नसल्याने कारवाई करण्याचे निर्णय साखर आयुक्तांनी घेतला. २२०० ते २५०० पर्यंत एफआरपी रक्कम होत असली तरी यातूनच तोडणी वाहतूक खर्च वजा करता १७०० ते १८०० रुपये ऐवढाच दर देणे शक्य असल्याचे मत साखर कारखानदार करीत आहेत. त्यामुळे गतवर्षीचे दर देखील मिळणार का? याबाबत शेतकऱ्यांतून संभ्रम व्यक्त होत आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसण्याचे काम ज्यांना शेतकऱ्यांच्या जीवावर यश मिळालं, त्या स्वाभिमानीनच शेतकऱ्याकडे राजकीय स्वार्थापोटी माघार घेतल्याची चर्चा आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे मिळेल तो दर पदरात पाडून घेण्याचीच भूमिका शेतकऱ्यांनी घेत कारखान्यांच्या ऊस तोडणीस मूक संमती दिली आहे. राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक ऊसदर समिती नेमून केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केल्याची चर्चा रंगू लागली आहे. ऊसदराचे धोरण साखरसम्राटांनी पुढाकार घेऊन सोडविणे आता गरजेचे बनले आहे.