शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

साखरेचा ‘गोडवा’च म्हणे ठरविणार भावी आमदार!

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

ऊसदर ठरणार कळीचा मुद्दा : विरोधकांनी केले कारखानदारांना लक्ष्य; काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र शांत

मोहन मस्कर-पाटील - सातारा - ‘माण’ वगळता उर्वरित ठिकाणी भावी आमदार ऊसदरच ठरविणार आहे. आमदारकीसाठी नशीब आजमावणारे सात उमेदवार साखर कारखान्याशी संबंधित आहेत. परिणामी तेथे ऊसदराचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येऊ लागला आहे. ‘स्वाभिमानी’ने ऊसदराचा विषय कळीचा मुद्दा केला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र या विषयावर पूर्णत: शांत आहेत. विशेष म्हणजे तीन आजी अ्न दोन माजी आमदार तसेच अन्य दोन उमेदवार साखर कारखान्यांशी संबंधित आहेत.‘कोरेगाव’च्या मैदानात नशीब आजमावणारे उमेदवार कारखान्याशी संबंधित नसलेतरी ‘जरंडेश्वर’च्या खासगीकरणाचा मुद्दा काँग्रेसच्या प्रचारात आहे. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी साखरपट्ट्यात उसदर हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविल्यामुळे साखर कारखान्यांशी संबंधित उमेदवारही ‘अस्वस्थ’ आहेत. ‘अजिंक्यतारा’ कारखान्याचे सर्वेसर्वा शिवेंद्रसिंहराजे भोसले ‘सातारा-जावळी’तून नशीब आजमावत आहेत. येथील लढत आरोप प्रत्यारोपांनी गाजू लागली आहे. स्थानिक मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे. कारखान्याच्या अनुषंगाने मात्र प्रचाराचा मुद्दा कोणी केलेला नाही.‘सह्याद्री’चे सर्वेसर्वा बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात ‘कऱ्हाड उत्तर’मध्ये ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे धैर्यशील कदम यांनी रान उठविले आहे. ऊसदराचा विषय आणि तोडणी वेळेवर होत नसल्याची सभासदांची तक्रार असल्याचा दावा कदम आणि घोरपडे यांनी केल्याने येथील लढत रंगतदार आहे.पारंपरिक लढतीच्या ‘पाटण’मध्ये सत्यजितसिंह पाटणकर विरुध्द देसाई कारखान्याचे सर्वेसर्वा शंभूराज देसाई यांच्यात लढत आहे. कारखान्याच्या कार्यक्षमतेच्या अनुषंगाने येथे स्वत: शरद पवारांनी उपरोधिक टीका केली आहे. दराच्या अनुषंगाने ‘स्वाभिमानी’ने देसार्इंच्या सातारा निवासस्थानी ठिय्या आंदोलनही केले होते. दोन कार्यान्वित आणि एका प्रस्तावित कारखान्याची सत्ता ताब्यात असलेले मदन भोसले वाईतून नशीब आजमावत आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वात कमी दर ‘किसन वीर’ आणि ‘प्रतापगड’ या दोन कारखान्यांनी दिला असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.खासगी कारखानदारही आमदारकीच्या फडातआमदारकीच्या फडात खासगी साखर कारखानदारही उतरले आहेत. तासगावचे डॉ. नंदकुमार तासगावकर शिक्षणसम्राट असलेतरी ते फलटण येथे ‘शंभू महादेव’ कारखाना उभारत आहेत. यामुळेच त्यांचा या भागाशी संपर्क आला आणि फलटण राखीव असल्यामुळे त्यांनी शड्डू ठोकला. काँग्रेसी विचारधारा जोपासलेले रणजितसिंह देशमुख ‘माण’मधून शिवसेनेकडून लढत आहेत. ते पिंगळी येथे ‘माण-खटाव शुगर अँड पॉवर’ हा प्रकल्प उभारत आहेत. त्यांची सुतगिरणीही जोरात सुरु आहे. विरोधकांच्या रडारवर ‘रयत’‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये काँग्रेसचा ‘हात’ शाबूत ठेवणारे विलासराव पाटील-उंडाळकर अपक्ष उमेदवार असून त्यांचा ‘रयत’ कारखाना खासगी उद्योगसमूहाकडे आहे. मात्र, त्यांनी अजूनही पहिला हप्ता दिला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक दर देणारा ‘कृष्णा’ उंडाळकरांसमवेत आहे.