शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारीत राजकारण नको : रामराजे

By admin | Updated: October 16, 2015 22:43 IST

न्यू फलटण शुगर वर्क्स : मोळी पूजन कार्यक्रमात सर्वांचाच एकमेकांना सबुरीचा सल्ला

साखरवाडी : ‘साखर उद्योगामध्ये राजकारण आणि अर्थकारण यांचे घातक समीकरण सुरू आहे. शासन-साखर कारखान्यांचे प्रश्न समजून घेणार नसेल तर केंद्र सरकारने आमच्यावर ‘एफआरपी’ची बंधने टाकू नयेत. आमचे आम्ही ठरवू, असे सांगतानाच फलटण तालुक्यातील साखर कारखाने टिकले पाहिजेत. यासाठी साखरवाडीच्या साखर कारखान्याबाबत मी कधी राजकारण केले नाही आणि करणारही नाही,’ असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. दरम्यान, यावेळी सर्वांनीच एकमेकांना सबुरीचा सल्ला दिला.साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याच्या २०१५-१६ चा मोळी व गव्हाण पूजन कार्यक्रम रामराजे व उद्योगपती माधवराव आपटे यांच्या हस्ते झाला. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कारखान्याचे संचालक महेश साळुंखे-पाटील, स्टेट बँकेचे डेप्यूटी जनरल मॅनेजर शेटी, रविरंजन प्रसाद, दत्त इंडिया प्रा. लि. चे जितेंद्र धारुशेठ, यतीन भाई, शंकरराव माडकर, सरपंच विक्रमसिंह भोसले, डी. के. पवार, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘सरकारने साखर कारखान्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा कहरच केला आहे, तो बदलला पाहिजे. त्यांनी कारखान्याचे प्रश्न समजून घेऊन कारखाने टिकले पाहिजेत, यासाठी धोरण आखले पाहिजे. सध्या उसाला एकरकमी दराची मागणी होऊ लागली असताना बँका कारखान्यांना एकरकमी दर देत नसल्याने ते शक्य नाही. ऊसउत्पादकांना योग्य दर मिळाला पाहिजे; परंतु तो मागताना भान ठेवले पाहिजे.’यावेळी माणिक भोसले, मारुती माडकर, युनियनचे बाळासाहेब भोसले, केन सप्लायर्सचे दशरथ चोरमले, पोपट भोसले, बाळासाहेब खलाटे, श्रीहरी वाघ आदींसह शेतकरी, सप्लायर्स, कामगार उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांनी स्वागत केले. (वार्ताहर)दिवाळीपूर्वी ‘एफआरपी’ची रक्कम : प्रल्हादराव साळुंखे-पाटीलप्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी कारखान्याची गेल्या ८५ वर्षांतील चढ-उताराविषयी माहिती दिली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक दर देणे क्रमप्राप्त असून, यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करून धाडसाने या हंगामात कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. ऊस उत्पादकांना ३०० रुपयांचे पेमेंट बँक खात्यावर जमा केले असून, ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास आम्ही बांधील आहोत. याबाबत शेतकऱ्यांनी निश्चित राहावे. दिवाळीपूर्वी आम्ही ‘एफआरपी’ची रक्कम देणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.