शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पश्चिम बंगालमध्ये सुडाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या हिंसाचारात त्रास भोगावा लागला आहे. या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते निषेधाचे फलक घेऊन उभे होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, त्या राज्याचे राज्यात सुडाचे राजकारण चालू झालेले आहे की, ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा खून करणे त्यांच्या घरांची जाळपोळ करणे त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत, ही लोकशाहीची हत्या आहे, त्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करत आहेत. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाहीबद्दल आस्था असणारे सर्वसामान्य नागरिकही यात सहभागी झाले होते. या आंदोलनाची आणि निषेधाची दखल घेऊन केंद्र सरकारपर्यंत आमच्या मागण्या पोहोचवाव्यात आणि पश्चिम बंगालमधील दंगेखोर व अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी व इतर कार्यकर्त्यांनी आताच निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. (छाया : जावेद खान)

05javed