शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

यशस्वी आंतरराष्ट्रीय कामगिरीची हॅट्ट्रिक !

By admin | Updated: August 4, 2016 01:29 IST

ग्रामीण विद्यार्थ्यांचे यश : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मलेशियात सुवर्णयश

भुर्इंज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्यांदा परदेशात यशस्वी कामगिरीची हॅट्ट्रिक करण्याची किमया केली आहे. पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मलेशियात जाऊन आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत भारताचा विजयी झेंडा फडकावल्याने संपूर्ण परिसरातून या विद्यार्थ्यांवर कौतुक होत आहे. अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन, आॅस्ट्रेलिया, थायलंड, नेपाळ, तैवान, मलेशिया, भारत आदी २१ देशांमधील तब्बल १६३९ विद्यार्थी मलेशियात झालेल्या या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये तिरंगाचे ४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, वृषाली रवींद्र पवार ( तिसरी), गिरिराज जयवंत पवार (पाचवी), सलील समीर राजे (पाचवी) आणि तन्मय सुविचार कुंभार (आठवी) या चारही स्पर्धकांनी रौप्य पदक व ट्रॉफी पटकावले. मोठ्या संख्येने सहभागी झालेले देश आणि त्यांचे विद्यार्थी स्पर्धक, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हुशारीचा, कौशल्याचा या स्पर्धेत मोठा कस लागला. तरीही या जागतिक कामगिरीत सरस कामगिरी बजावत तिरंगाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश विशेष उल्लेखनीय व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मुख्याध्यापिका वैशाली कुंभार मलेशियाला गेल्या होत्या. यापूर्वी तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँकॉक, थायलंड, नेपाळ या ठिकाणी यशस्वी कामगिरी बजावत आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची आता तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुनीता पाडळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्या वनिता पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)