शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

धोकादायक पुलांचा अहवाल तातडीने सादर करा

By admin | Updated: May 24, 2017 23:11 IST

धोकादायक पुलांचा अहवाल तातडीने सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते अशा ठिकाणची पहाणी करावी तसेच जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पाहणी करून याचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा तयार करुन सर्वप्रथम आपले नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये पूर परिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी गावातील युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालावे. गावात चांगल्या प्रकारे पोहता येणाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक संकलीत करुन गावातील भिंतींवर रंगवून घ्यावे व प्रदर्शीत करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पाहणी करुन उपाययोजना कराव्यात. यांत्रिकी विभागाने जिल्ह्यातील जेसीबी मशिनरीची माहिती तहसीलदारांना द्यावी. नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत कारवाई करावी. गट विकास अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रत्येक गावात कार्यशाळा घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.या बैठकीस प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, हिम्मत खराडे, सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पोलिसांसाठी प्रशिक्षण पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील ज्या पुलांवरुन पाणी वाहते अशा पुलांवरुन वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात येईल. यासाठी बॅरीकेट्चा वापर करण्यात येईल. आपत्तीच्या काळात ग्राम सुरक्षा दल, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यात येईल. निवडक पोलिसांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच अग्नीशमन दल दक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.