राज्य शासनाच्यावतीने १ ते १५ जानेवारी या पंधरवड्यात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वसुंधरेच्या रक्षणेची हरित शपथ घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, हरितसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर आधारित असणाऱ्या वसुंधरेचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. याची जाण विद्यार्थी, पालक व समाजाला व्हावी, हा यासाठी हा उपक्रम शासनामार्फत राबविला जात असल्याची माहिती यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना भिसे यांनी दिली. हरितसेना प्रमुख प्रकाश पाटील यांनी वसुंधरा अभियानाची ओळख विद्यार्थिनींना करून दिली. दहावीतील ऐश्वर्या आणेकर या विद्यार्थिनीने वसुंधरा अभियान हरित शपथेचे वाचन केले.
फोटो : ०५केआरडी०४
कॅप्शन : मलकापूर येथील प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळेत विद्यार्थिनींनी वसुंधरा रक्षणाची शपथ घेतली.