शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विद्यार्थिनींनी घेतली वसुंधरा रक्षणाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

राज्य शासनाच्यावतीने १ ते १५ जानेवारी या पंधरवड्यात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर येथील मळाईदेवी शिक्षण ...

राज्य शासनाच्यावतीने १ ते १५ जानेवारी या पंधरवड्यात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वसुंधरेच्या रक्षणेची हरित शपथ घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, हरितसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर आधारित असणाऱ्या वसुंधरेचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. याची जाण विद्यार्थी, पालक व समाजाला व्हावी, हा यासाठी हा उपक्रम शासनामार्फत राबविला जात असल्याची माहिती यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना भिसे यांनी दिली. हरितसेना प्रमुख प्रकाश पाटील यांनी वसुंधरा अभियानाची ओळख विद्यार्थिनींना करून दिली. दहावीतील ऐश्वर्या आणेकर या विद्यार्थिनीने वसुंधरा अभियान हरित शपथेचे वाचन केले.

फोटो : ०५केआरडी०४

कॅप्शन : मलकापूर येथील प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळेत विद्यार्थिनींनी वसुंधरा रक्षणाची शपथ घेतली.