शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

विद्यार्थ्यांना विषबाधा अनागोंदी कारभारामुळेच !

By admin | Updated: April 7, 2016 00:03 IST

पाडेगाव आश्रमशाळा : जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून पाहणी; आरोग्याविषयी काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील समता आश्रम शाळेत मंगळवारी झालेल्या प्रकरणानंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन शाळेतील यंत्रणेची पाहणी केली. विद्यार्थी वसतिगृहाची कमालीची दुरवस्था पिण्याच्या पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतचा अभाव जाणवल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आश्रमशाळेच्या अनागोंदी कारभारामुळेच विद्यार्थ्यांची अशी दुर्दशा झाली असल्याचे निदर्शनास आणून संपूर्ण यंत्रणेचाच पोलखोल केला.समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने जुलाब, उलट्या अशा त्रासाने ग्रासले. त्यानंतर त्यांना लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, खंडाळा सभापती नितीन भरगुडे-पाटील, पं. स. सदस्या अनिता शेळके, समाजकल्याण अधिकारी साळी, अन्न तपासणी निरीक्षक यू. एस. लोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. मुलांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाडेगाव येथील आश्रमशाळेची पाहणी केली. स्वयंपाकगृहाची अस्वच्छता, धान्य ठेवण्याकडे केलेले दुर्लक्ष तसेच निकृष्ट दर्जाची डाळ वापरत असल्याचे निदर्शनास आले. ज्या टाकीतून मुलांना पाणीपुरवठा केला जातो. त्याची स्वच्छता नव्हती. टाकीला शेवाळ चढले होते. तर त्यात कोणतेही प्रमाण न घेता टीसीएल टाकण्यात आले. या शाळेत ११०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ९०० विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यांच्याकडे आवश्यक रितीने लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने सभापती सुरेखा शेवाळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)पाण्याची परिस्थिती जैसे थेवसतिगृहातील ३३ विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब झाले. त्यापैकी गंभीर प्रकृती असणाऱ्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी आणखी काही मुलांना तसाच त्रास सुरू झाला. त्यांनाही लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या प्रकारानंतर वसतिगृहाच्या पाण्याची अवस्था जैसे थीच होती.शाळेकडून नेहमी स्वच्छता राखली जाते. सध्या ग्रामपंचायतीचे नळकनेक्शन बंद असल्याने कुपनलिकेचे पाणी वापरावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून यापुढे योग्य ती काळजी घेतली जाईल.- पवन सूर्यवंशी, संचालक, आश्रमशाळाविद्यार्थ्यांची विचारपूस मुलावर उपचार सुरू असल्याचे समजताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, लोणंदमधील भाजपाचे नेते विनोद क्षीरसागर, लक्ष्मणराव शेळके, अभिजित खंडागळे यांनी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली.