शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

जिल्ह्यात वळवाची जोरदार हजेरी; गारपिटीने दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वळवाचा जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंड झाले. ...

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वळवाचा जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंड झाले. तर साताऱ्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी गारा पडल्या. या गारांमुळे फळबागांना दणका बसला. दरम्यान, फलटण, कोरेगाव, वाई तालुक्यात पाऊस आणि गारपीट झाली.

जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस पडला होता. तसेच खटाव आणि कोरेगाव तालुक्यात मोठी गारपीट झाली होती. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. तर पावसामुळे उकाडा कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली होती. साताऱ्यात तर कमाल तापमान ३८ अंशापर्यंत गेले होते. जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यांतील कमाल तापमान तर ४० अंशापर्यंत गेले होते. यामुळे नागरिकांसह जनावरांनाही उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागला. असे असतानाच सोमवारी मात्र, काही भागांतील लोकांची उकाड्यापासून सुटका झाली. वळवाचा पाऊस आणि काही ठिकाणी गाराही पडल्या.

सातारा शहरात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल अशी चिन्हे दिसत होती. सायंकाळी साडेचारनंतर ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला दहा मिनिटे पाऊस हळूहळू सुरू होता. त्यानंतर पुन्हा जोरदार धारा पडू लागल्या. त्याचबरोबर गारा पडण्यास सुरुवात झाली. यामुळे पत्र्याच्या घरावर धडधड आवाज सुरू झाला. यामुळे सातारकर कुतूहलाने गारा पडताना पाहत होते. काही नागरिकांनी तर गारा वेचून खाण्याचा आनंद घेतला. जवळपास २० मिनिटे पाऊस पडत होता. तर यादरम्यान ऊनही पडले होते. ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे.

फलटण शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. फलटण शहरात तर जोरदार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. काही घरातही पाणी शिरले. यामुळे नुकसान झाले. तर वीज गेल्याने अंधार पसरला होता. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर, वाठार स्टेशन परिसरातही पावसासह गारा पडल्या. त्याचबरोबर वाई तालुक्यातील वेळे परिसरातही गारांसह पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आणि गारपिटीमुळे मका, टोमॅटोसह द्राक्ष, डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे.

फोटो २६सातारा रेन नावाने...

फोटो ओळ : सातारा शहरात पाऊस आणि गारा पडल्या. यावेळी छत्रीत गारा पकडून खाण्याचा आनंदही नागरिकांनी घेतला.

............................................................................