शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यात वळवाची जोरदार हजेरी; गारपिटीने दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वळवाचा जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंड झाले. ...

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वळवाचा जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंड झाले. तर साताऱ्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी गारा पडल्या. या गारांमुळे फळबागांना दणका बसला. दरम्यान, फलटण, कोरेगाव, वाई तालुक्यात पाऊस आणि गारपीट झाली.

जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस पडला होता. तसेच खटाव आणि कोरेगाव तालुक्यात मोठी गारपीट झाली होती. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. तर पावसामुळे उकाडा कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली होती. साताऱ्यात तर कमाल तापमान ३८ अंशापर्यंत गेले होते. जिल्ह्याच्या दुष्काळी माण, खटाव तालुक्यांतील कमाल तापमान तर ४० अंशापर्यंत गेले होते. यामुळे नागरिकांसह जनावरांनाही उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागला. असे असतानाच सोमवारी मात्र, काही भागांतील लोकांची उकाड्यापासून सुटका झाली. वळवाचा पाऊस आणि काही ठिकाणी गाराही पडल्या.

सातारा शहरात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल अशी चिन्हे दिसत होती. सायंकाळी साडेचारनंतर ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला दहा मिनिटे पाऊस हळूहळू सुरू होता. त्यानंतर पुन्हा जोरदार धारा पडू लागल्या. त्याचबरोबर गारा पडण्यास सुरुवात झाली. यामुळे पत्र्याच्या घरावर धडधड आवाज सुरू झाला. यामुळे सातारकर कुतूहलाने गारा पडताना पाहत होते. काही नागरिकांनी तर गारा वेचून खाण्याचा आनंद घेतला. जवळपास २० मिनिटे पाऊस पडत होता. तर यादरम्यान ऊनही पडले होते. ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. या पावसामुळे उकाडा कमी झाला आहे.

फलटण शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. फलटण शहरात तर जोरदार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. काही घरातही पाणी शिरले. यामुळे नुकसान झाले. तर वीज गेल्याने अंधार पसरला होता. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर, वाठार स्टेशन परिसरातही पावसासह गारा पडल्या. त्याचबरोबर वाई तालुक्यातील वेळे परिसरातही गारांसह पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आणि गारपिटीमुळे मका, टोमॅटोसह द्राक्ष, डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे.

फोटो २६सातारा रेन नावाने...

फोटो ओळ : सातारा शहरात पाऊस आणि गारा पडल्या. यावेळी छत्रीत गारा पकडून खाण्याचा आनंदही नागरिकांनी घेतला.

............................................................................