शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सह्याद्रीच्या कड्यांना वीरांची नावे देण्याची जोरदार मागणी

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

...गर्जामहाराष्ट्र माझा

सातारा/महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या फौज फाट्यात सातारा जिल्ह्यातील अनेक पराक्रमी मावळ्यांचा सहभाग होता. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, जीवा महाले अशा अनेक वीरांनी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावली. आज या शूरवीरांचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो. म्हणूनच या शूरांचे स्मरण राहण्यासाठी महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉर्इंटची नावे बदलून त्यांना या वीरांची नावे देण्यात काहीच गैर नाही. अशी जोरदार प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे.सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी मुघल साम्राज्याच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्यासाठी अवघ्या सोळाव्या वर्षी हातात तलवार घेतली. अठरा पगड जातीधर्मातल्या आपल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी रायरेश्वर गडावर रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. कालांतराने शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगेत लढाया केल्या. यात अनेक मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली. मात्र, व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या ब्रिटिशांनी एक-एक करून अनेक राज्यांमध्ये आपली राजवट स्थापित केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपली नावे त्या-त्या भागाला दिली. आजही त्याच नावाने ती ओळखली जातात. महाबळेश्वरला आल्यानंतर ब्रिटिशांनी याठिकाणी असणाऱ्या पॉर्इंटला आपलीच नावे देऊन टाकली. सुमारे ६६ वर्षांपूर्वी इंग्रजांचे राज्य खालसा होऊनही महाबळेश्वर येथील पॉर्इंटला त्यांची नावे आजही तशीच राहिली आहे. हे पॉर्इंट सरदार व मावळ्यांच्या नावाने ओळखले जावेत, यासाठी ‘लोकमत’ ने मोहीम सुरू केली आहे. शूरवीरांच्या स्मृती निरंतर जतन करता याव्यात, यासाठी महाबळेश्वरमधील पॉर्इंटचे नव्याने नामकरण झालेच पाहिजे, असा सूर आता जिल्ह्यातून उमटू लागला आहे. (प्रतिनिधी)