शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सह्याद्रीच्या कड्यांना वीरांची नावे देण्याची जोरदार मागणी

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

...गर्जामहाराष्ट्र माझा

सातारा/महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या फौज फाट्यात सातारा जिल्ह्यातील अनेक पराक्रमी मावळ्यांचा सहभाग होता. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, जीवा महाले अशा अनेक वीरांनी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावली. आज या शूरवीरांचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो. म्हणूनच या शूरांचे स्मरण राहण्यासाठी महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉर्इंटची नावे बदलून त्यांना या वीरांची नावे देण्यात काहीच गैर नाही. अशी जोरदार प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे.सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी मुघल साम्राज्याच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्यासाठी अवघ्या सोळाव्या वर्षी हातात तलवार घेतली. अठरा पगड जातीधर्मातल्या आपल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी रायरेश्वर गडावर रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. कालांतराने शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगेत लढाया केल्या. यात अनेक मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली. मात्र, व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या ब्रिटिशांनी एक-एक करून अनेक राज्यांमध्ये आपली राजवट स्थापित केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपली नावे त्या-त्या भागाला दिली. आजही त्याच नावाने ती ओळखली जातात. महाबळेश्वरला आल्यानंतर ब्रिटिशांनी याठिकाणी असणाऱ्या पॉर्इंटला आपलीच नावे देऊन टाकली. सुमारे ६६ वर्षांपूर्वी इंग्रजांचे राज्य खालसा होऊनही महाबळेश्वर येथील पॉर्इंटला त्यांची नावे आजही तशीच राहिली आहे. हे पॉर्इंट सरदार व मावळ्यांच्या नावाने ओळखले जावेत, यासाठी ‘लोकमत’ ने मोहीम सुरू केली आहे. शूरवीरांच्या स्मृती निरंतर जतन करता याव्यात, यासाठी महाबळेश्वरमधील पॉर्इंटचे नव्याने नामकरण झालेच पाहिजे, असा सूर आता जिल्ह्यातून उमटू लागला आहे. (प्रतिनिधी)