शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

गाफील न राहता ताकदीने लढा द्या; शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:37 IST

सातारा : ‘शहराची हद्दवाढ, मेडिकल कॉलेज किंवा आयटी पार्क हे सर्व प्रश्न भाजप सरकारमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शहराची ...

सातारा : ‘शहराची हद्दवाढ, मेडिकल कॉलेज किंवा आयटी पार्क हे सर्व प्रश्न भाजप सरकारमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शहराची विकासकामे रोखण्याचे काम या सरकारसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले आहे,’ असा घणाघाती आरोप करीत ‘आगामी विधासभा निवडणुकीला गाफील न राहता ताकदीने सामोरे जाऊ या,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.आगामी विनाधसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, बाळासाहेब खंदारे, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत भोसले, प्रकाश गवळी, प्रकाश बडेकर, सुधीर धुमाळ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘अनेक कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब महाराजांसोबत काम केलं आहे. त्यांच्याइतकेच प्रेम जनता माझ्यावरही करीत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची गरज आहे. शहरात संपर्क वाढविण्यावर भर द्यायला हवा. केवळ विकासकामे करून चालणार नाही तर लोकांमध्ये मिसळायला हवे. लोकांच्या सुख-दु:खात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. सर्वसामान्य जनतेबरोबरच महिलांच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करा. गेल्या निवडणुकीला आपण कोठे कमी पडलो, याचा विचार व्हावा.’जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही बैठक आहे. कोण किती पाण्यात, हे यापूर्वी आपल्याला कळले आहे. सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जावळी तालुका अधिक प्रेम करणारा आहे. त्याप्रमाणे साताऱ्यानेही शिवेंद्रसिंहराजेंवर प्रेम करावे.’सुधीर धुमाळ म्हणाले, ‘बुथ आणि वॉर्डनिहाय काम करावे. लहान कार्यकर्त्यांचेही मत विचारात घ्यावे. विरोधकाला कमजोर समजू नका. नगरपालिकेत सहा नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.’प्रकाश गवळी म्हणाले, ‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा आत्ताच ठरली पाहिजे. नेता खंबीर असेल तर कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. संभाषण कौशल्य आणि नवीन पद्धतींचा अभ्यास केला पाहिजे. लोकसभेला कोणाचा कोणाला पायपूस नव्हता,’ अशी नाराजी व्यक्त करत गवळी पुढे म्हणाले, ‘सक्षम आणिविश्वासू कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत.’‘शहरातील विविध भागांत बैठकांचे आयोजन करावे. सत्ताधारी आघाडीमुळे कामे होऊ शकली नाहीत, हे पटवून द्यावे. शहराबाहेर रोजगारासाठी गेलेल्या युवकांसोबत संपर्क वाढवावा,’ असे मत अशोक मोने यांनी व्यक्त केले.शहराचा विकास भाजपने रोखला‘सातारा शहरात मोठे उद्योगधंदे येत नाहीत, येथील एमआयडीसी विकसित होत नाही, तरुणांना रोजगार नाही, अशी ओरड नेहमीच होत आली आहे; परंतु सातारा एमआयडीसीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. यासाठी देगाव येथील एक हजार एकर जागाही आरक्षित केली होती. देगाव, वर्णे व निगडी येथील शेतकरी एमआयडीसीला जागा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे साताºयात मोठी एमआयडीसी विकसित होऊ शकली नाही. आयटी पार्कची हीच परिस्थिती आहे. मोठ-मोठ्या कंपन्यांना आयटी पार्कसाठी पुणे शहरच सोयीस्कर वाटते. साताºयातील मेडिकल कॉलेजची जागा हस्तांतरित करण्यासाठी या सरकारला तीन वर्षे लागली. आता यासाठी दोनशे ते तीनशे कोटींची तरतूद सरकार करेल की नाही, याची शंका आहे, असे मत यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. तर हद्दवाढ फायद्याची नसल्याने भाजप नेत्यांचाच याला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.