शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही खडी फोडण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:36 IST

अधिकारीही येईनात : कामाच्या दजार्चे काय; ऐन पावसामध्ये बनपुरी-वडूज रस्ता मुरुमीकरण

आॅनलाईन लोकमतमायणी (जि. सातारा), दि. २४ : खटाव तालुक्यातील बनपुरी-येरळवाडी-वडूज या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. असे असतानाही रस्त्याचे काम सुरू आहे. ऐन पावसामध्ये मुरुमीकरण व खडी फोडण्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी या कामाचा दर्जा तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे नेमके पाणी कोठे मुरत आहे, असा सवाल येरळवाडी व परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. बनपुरी, येरळवाडी ग्रामस्थांना कातरखटाव मार्गे वडूजला जावे लागत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होत होते. म्हणून या मागार्साठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वडूज, गणेशवाडी व बनपुरी या मागार्साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम करताना प्रथम मातीकाम, खडीकरण करणे यासह अनेक स्तरांची माहिती येथील फलकावर लिहली आहे. पण खरेच या पद्धतीने काम होत आहे का, हे अधिकाऱ्यांनी वेळच्यावेळी पाहणे गरजेचे आहे. असे असताना अधिकारी काय करतात, हा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी तक्रार करूनही अधिकारी का येत नाहीत, या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू झाले, मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर पावसामुळे ठिकठिकाणे खड्डे पडून त्याठिकाणी रस्ताही खचला आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी अनेकवेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी तक्रार केली आहे. तरीही या कामाकडे अधिकारी फिरकले नाहीत, अशी तक्रार ही ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे नेमके पाणी मुरतंय कोठे हे काही कळेना, असे झाले आहे. काही असो अशी कामे अनेक वर्षांतून मंजूर होतात. त्यासाठीही एकदाच निधी दिला जातो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाच्या दजार्बाबत लक्ष देणे गरजेचे आहे. इतर तालुक्याच्या दृष्टीने खटाव तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था आहे. रस्त्यावर खड्डा आला की खटाव तालुका आला, असे प्रवासी बोलतात. त्यामुळे रस्त्याचे काम चांगले होणे आवश्यक आहे. सध्या या रस्त्याबाबत ठेकेदाराची चूक आहे का? त्यावर लक्ष ठेवणाऱ्या संबंधित विभागाची हे कोडे उलगडत नाही. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनीच लक्ष घालणे महत्त्वाचे ठरत आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरील खडी बाजूला केली नाही तर येत्या दोन दिवसांत येरळवाडीतील युवकांच्या सहकायार्तून व ग्रामस्थांची मदत घेऊन खडी बाजूला करण्याचे काम हाती घेणार आहोत. त्यानंतर रस्ता पूर्ववत करून विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबवणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीची सेवा सुरू करावी, यासाठी विनंती करणार आहे. - योगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ता, येरळवाडी