शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कडक लॉकडाऊनमुळे खरेदीसाठी गर्दी उसळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:37 IST

सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून होणार आहे. ...

सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून होणार आहे. यामुळे सातारकरांनी साहित्य खरेदीसाठी बुधवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. काही दुकानांपुढे तर रांग लावण्यात आली होती. नागरिकांचा अधिककरून किराणा साहित्य खरेदीवरच भर असल्याचे दिसून आले.

मागील एक वर्षापासून कोरोना महामारीचे संकट सुरू झालेले आहे. पहिल्या लाटेच्यावेळी मार्चपासून जवळपास सहा महिने लॉकडाऊन होता. लोकांवर अनेक बंधने आली होती. तेव्हा कुठे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. तर, नागरिकांनीही नियमही पायदळी तुडवले. त्यातूनच आताची परिस्थिती उद्भवली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही बाधित मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मागील आठवड्यात काही निर्बंध घातले. पण, कोरोना रुग्ण काही केल्या कमी होईनात. त्यामुळे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच कलम १४४ ही लागू करण्यात आलेले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. मात्र, लोकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेरच पडता येणार नाही. त्यामुळे सोमवार, मंगळवारप्रमाणेच बुधवारी सकाळपासूनच नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते.

सातारा शहरात तर बुधवारी सकाळपासूनच दुकानांसमोर गर्दी झाली होती. त्यामुळे दुकानांपुढे रांग लागल्याचे दिसून आले. तसेच वाहनधारकही मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने वाहतुकीची कोंडी झालेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. सायंकाळपर्यंत दुकानात गर्दी होती. त्यामुळे दुकानदारांना रांगा लावताना वारंवार सांगावे लागत होते. तसेच वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबतही सूचना करण्यात येत होती.

चौकट :

राजवाडा, मोती चौक परिसरात गर्दी...

सातारा शहरात वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी दुकाने उघडली. तेव्हा सातारकरांनी तुफान गर्दी केली होती. दुकाने तसेच भाजी मंडईत सातारकर कोरोना नियम न पाळताच खरेदी करत होते. काही प्रमाणात मंगळवारीही खरेदीसाठी गर्दी दिसून आली. तर, बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन सुरू होत असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी किराणा मालाच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे राजवाडा परिसर, मोती चौक, ५०१ पाटीपर्यंत गर्दी दिसून आली.

फोटो दि.१४सातारा गर्दी...

फोटो ओळ : सातारा शहरात बुधवारी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. यामुळे किराणामालाच्या दुकानाबाहेर रांग लागली होती. (छाया : नितीन काळेल)

..........................................................