शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

माणुसकीहीन काही मंडळींनी दाखविला कचरा डेपोचा रस्ता

By admin | Updated: March 6, 2017 23:47 IST

उकिरडाच बनले कुरण : बहुतांश चौकातून जनावरांची हकालपट्टी

 सातारा : ‘माणुसकी अजून जिवंत आहे,’ असं अभिमानानं सांगितलं जातं. ते खरं असेलही; पण घटनांमुळे ते खोटं वाटू लागते. मालक पाळलेल्या गायींना चरण्यासाठी सोडून देतात. दिवसभर दारोदार फिरूनही त्यांना अन्न मिळत नाही. वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून पोलिसदादा अन् भाजी मंडईत विक्रेते हाकलून देतात. यातूनच शहरातील गायींनी अन्नासाठी सोनगाव कचरा डेपोचा रस्ता निवडला आहे. मुक्या जनावरांवर प्रेम करा, अशी शिकवण संतांनी दिली आहे. अनेक ठिकाणी दारावर आलेल्या गायींना भाकर, चपाती खाण्यासाठी दिली जाते. काही ठिकाणी या गायींनाही सवयच लागलेली आहे. ठरलेल्या वेळेला त्या दारावर येतात. घरातील माउली किंवा मुलंही लगेच खाण्यासाठी भाकर, काही वेळेस धान्य आणून देतात. त्यामुळे गायींचं पोटही भरतं. इतरांच्या शेतात जाऊन पिके खाण्याची वेळही त्यांच्यावर येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक सजीव प्राणी धडपडतो. पण समाजाने झिडकारले तर मात्र, ज्याची त्यालाच सोय करावी लागते. गायींच्या बाबतीतही काहीसं असंच घडत आहे. अनेक गायींचे मालक गायीच्या चरण्याची, सांभाळण्याची जबाबदारीच उचलत नाही. सकाळी आठ वाजले की त्यांना चरण्यासाठी गावात सोडून दिले जाते. तीच अवस्था भटक्या गायींची आहे. उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरावरचं गवत वाळून चाललं आहे. त्या अन्नासाठी दारोदार गेल्या तरी अनेकदा अन्न मिळत नाही. मंडईत गेल्या तर तेथील शेतकरी, भाजी विक्रेते किंवा ग्राहक त्यांना हाकलून लावतात. मग भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर थांबल्या तर वाहनचालक किंवा पोलिस हाकलून लावतात. यावर गायींनीच मार्ग काढला आहे. आता अनेक गायी शहरात दिसतच नाही. सकाळ झाली की त्यांची पावले बोगद्याच्या दिशेने वळायला लागलात. सातारा राजवाड्यापासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोत जाऊन मिळेल ते खाऊन गायी सध्या पोट भरत आहेत. त्याठिकाणी त्यांना हाकलून देणारे कोणीही नसल्याने दिवसभर त्या तेथेच असतात. सायंकाळचे पाच वाजल्यावर त्या पुन्हा घरी जाण्यासाठी शहराकडे येत आहेत. गायींच्या मालकांनीच त्यांना सांभाळण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) प्लास्टिक, ब्लेडचे पान खाण्यात दरम्यान, नुकतेच एका गायीने कचऱ्यातून ब्लेडचे पान खाल्ले होते. उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कचरा डेपोतून त्यांना पोटभरून अन्न मिळत असले तरी दुसरीकडे एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.