शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

माणुसकीहीन काही मंडळींनी दाखविला कचरा डेपोचा रस्ता

By admin | Updated: March 6, 2017 23:47 IST

उकिरडाच बनले कुरण : बहुतांश चौकातून जनावरांची हकालपट्टी

 सातारा : ‘माणुसकी अजून जिवंत आहे,’ असं अभिमानानं सांगितलं जातं. ते खरं असेलही; पण घटनांमुळे ते खोटं वाटू लागते. मालक पाळलेल्या गायींना चरण्यासाठी सोडून देतात. दिवसभर दारोदार फिरूनही त्यांना अन्न मिळत नाही. वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून पोलिसदादा अन् भाजी मंडईत विक्रेते हाकलून देतात. यातूनच शहरातील गायींनी अन्नासाठी सोनगाव कचरा डेपोचा रस्ता निवडला आहे. मुक्या जनावरांवर प्रेम करा, अशी शिकवण संतांनी दिली आहे. अनेक ठिकाणी दारावर आलेल्या गायींना भाकर, चपाती खाण्यासाठी दिली जाते. काही ठिकाणी या गायींनाही सवयच लागलेली आहे. ठरलेल्या वेळेला त्या दारावर येतात. घरातील माउली किंवा मुलंही लगेच खाण्यासाठी भाकर, काही वेळेस धान्य आणून देतात. त्यामुळे गायींचं पोटही भरतं. इतरांच्या शेतात जाऊन पिके खाण्याची वेळही त्यांच्यावर येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक सजीव प्राणी धडपडतो. पण समाजाने झिडकारले तर मात्र, ज्याची त्यालाच सोय करावी लागते. गायींच्या बाबतीतही काहीसं असंच घडत आहे. अनेक गायींचे मालक गायीच्या चरण्याची, सांभाळण्याची जबाबदारीच उचलत नाही. सकाळी आठ वाजले की त्यांना चरण्यासाठी गावात सोडून दिले जाते. तीच अवस्था भटक्या गायींची आहे. उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरावरचं गवत वाळून चाललं आहे. त्या अन्नासाठी दारोदार गेल्या तरी अनेकदा अन्न मिळत नाही. मंडईत गेल्या तर तेथील शेतकरी, भाजी विक्रेते किंवा ग्राहक त्यांना हाकलून लावतात. मग भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर थांबल्या तर वाहनचालक किंवा पोलिस हाकलून लावतात. यावर गायींनीच मार्ग काढला आहे. आता अनेक गायी शहरात दिसतच नाही. सकाळ झाली की त्यांची पावले बोगद्याच्या दिशेने वळायला लागलात. सातारा राजवाड्यापासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोत जाऊन मिळेल ते खाऊन गायी सध्या पोट भरत आहेत. त्याठिकाणी त्यांना हाकलून देणारे कोणीही नसल्याने दिवसभर त्या तेथेच असतात. सायंकाळचे पाच वाजल्यावर त्या पुन्हा घरी जाण्यासाठी शहराकडे येत आहेत. गायींच्या मालकांनीच त्यांना सांभाळण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) प्लास्टिक, ब्लेडचे पान खाण्यात दरम्यान, नुकतेच एका गायीने कचऱ्यातून ब्लेडचे पान खाल्ले होते. उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कचरा डेपोतून त्यांना पोटभरून अन्न मिळत असले तरी दुसरीकडे एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.