शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

माणुसकीहीन काही मंडळींनी दाखविला कचरा डेपोचा रस्ता

By admin | Updated: March 6, 2017 23:47 IST

उकिरडाच बनले कुरण : बहुतांश चौकातून जनावरांची हकालपट्टी

 सातारा : ‘माणुसकी अजून जिवंत आहे,’ असं अभिमानानं सांगितलं जातं. ते खरं असेलही; पण घटनांमुळे ते खोटं वाटू लागते. मालक पाळलेल्या गायींना चरण्यासाठी सोडून देतात. दिवसभर दारोदार फिरूनही त्यांना अन्न मिळत नाही. वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून पोलिसदादा अन् भाजी मंडईत विक्रेते हाकलून देतात. यातूनच शहरातील गायींनी अन्नासाठी सोनगाव कचरा डेपोचा रस्ता निवडला आहे. मुक्या जनावरांवर प्रेम करा, अशी शिकवण संतांनी दिली आहे. अनेक ठिकाणी दारावर आलेल्या गायींना भाकर, चपाती खाण्यासाठी दिली जाते. काही ठिकाणी या गायींनाही सवयच लागलेली आहे. ठरलेल्या वेळेला त्या दारावर येतात. घरातील माउली किंवा मुलंही लगेच खाण्यासाठी भाकर, काही वेळेस धान्य आणून देतात. त्यामुळे गायींचं पोटही भरतं. इतरांच्या शेतात जाऊन पिके खाण्याची वेळही त्यांच्यावर येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक सजीव प्राणी धडपडतो. पण समाजाने झिडकारले तर मात्र, ज्याची त्यालाच सोय करावी लागते. गायींच्या बाबतीतही काहीसं असंच घडत आहे. अनेक गायींचे मालक गायीच्या चरण्याची, सांभाळण्याची जबाबदारीच उचलत नाही. सकाळी आठ वाजले की त्यांना चरण्यासाठी गावात सोडून दिले जाते. तीच अवस्था भटक्या गायींची आहे. उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरावरचं गवत वाळून चाललं आहे. त्या अन्नासाठी दारोदार गेल्या तरी अनेकदा अन्न मिळत नाही. मंडईत गेल्या तर तेथील शेतकरी, भाजी विक्रेते किंवा ग्राहक त्यांना हाकलून लावतात. मग भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर थांबल्या तर वाहनचालक किंवा पोलिस हाकलून लावतात. यावर गायींनीच मार्ग काढला आहे. आता अनेक गायी शहरात दिसतच नाही. सकाळ झाली की त्यांची पावले बोगद्याच्या दिशेने वळायला लागलात. सातारा राजवाड्यापासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोत जाऊन मिळेल ते खाऊन गायी सध्या पोट भरत आहेत. त्याठिकाणी त्यांना हाकलून देणारे कोणीही नसल्याने दिवसभर त्या तेथेच असतात. सायंकाळचे पाच वाजल्यावर त्या पुन्हा घरी जाण्यासाठी शहराकडे येत आहेत. गायींच्या मालकांनीच त्यांना सांभाळण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) प्लास्टिक, ब्लेडचे पान खाण्यात दरम्यान, नुकतेच एका गायीने कचऱ्यातून ब्लेडचे पान खाल्ले होते. उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कचरा डेपोतून त्यांना पोटभरून अन्न मिळत असले तरी दुसरीकडे एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.