शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीहीन काही मंडळींनी दाखविला कचरा डेपोचा रस्ता

By admin | Updated: March 6, 2017 23:47 IST

उकिरडाच बनले कुरण : बहुतांश चौकातून जनावरांची हकालपट्टी

 सातारा : ‘माणुसकी अजून जिवंत आहे,’ असं अभिमानानं सांगितलं जातं. ते खरं असेलही; पण घटनांमुळे ते खोटं वाटू लागते. मालक पाळलेल्या गायींना चरण्यासाठी सोडून देतात. दिवसभर दारोदार फिरूनही त्यांना अन्न मिळत नाही. वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून पोलिसदादा अन् भाजी मंडईत विक्रेते हाकलून देतात. यातूनच शहरातील गायींनी अन्नासाठी सोनगाव कचरा डेपोचा रस्ता निवडला आहे. मुक्या जनावरांवर प्रेम करा, अशी शिकवण संतांनी दिली आहे. अनेक ठिकाणी दारावर आलेल्या गायींना भाकर, चपाती खाण्यासाठी दिली जाते. काही ठिकाणी या गायींनाही सवयच लागलेली आहे. ठरलेल्या वेळेला त्या दारावर येतात. घरातील माउली किंवा मुलंही लगेच खाण्यासाठी भाकर, काही वेळेस धान्य आणून देतात. त्यामुळे गायींचं पोटही भरतं. इतरांच्या शेतात जाऊन पिके खाण्याची वेळही त्यांच्यावर येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक सजीव प्राणी धडपडतो. पण समाजाने झिडकारले तर मात्र, ज्याची त्यालाच सोय करावी लागते. गायींच्या बाबतीतही काहीसं असंच घडत आहे. अनेक गायींचे मालक गायीच्या चरण्याची, सांभाळण्याची जबाबदारीच उचलत नाही. सकाळी आठ वाजले की त्यांना चरण्यासाठी गावात सोडून दिले जाते. तीच अवस्था भटक्या गायींची आहे. उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरावरचं गवत वाळून चाललं आहे. त्या अन्नासाठी दारोदार गेल्या तरी अनेकदा अन्न मिळत नाही. मंडईत गेल्या तर तेथील शेतकरी, भाजी विक्रेते किंवा ग्राहक त्यांना हाकलून लावतात. मग भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर थांबल्या तर वाहनचालक किंवा पोलिस हाकलून लावतात. यावर गायींनीच मार्ग काढला आहे. आता अनेक गायी शहरात दिसतच नाही. सकाळ झाली की त्यांची पावले बोगद्याच्या दिशेने वळायला लागलात. सातारा राजवाड्यापासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोत जाऊन मिळेल ते खाऊन गायी सध्या पोट भरत आहेत. त्याठिकाणी त्यांना हाकलून देणारे कोणीही नसल्याने दिवसभर त्या तेथेच असतात. सायंकाळचे पाच वाजल्यावर त्या पुन्हा घरी जाण्यासाठी शहराकडे येत आहेत. गायींच्या मालकांनीच त्यांना सांभाळण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) प्लास्टिक, ब्लेडचे पान खाण्यात दरम्यान, नुकतेच एका गायीने कचऱ्यातून ब्लेडचे पान खाल्ले होते. उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कचरा डेपोतून त्यांना पोटभरून अन्न मिळत असले तरी दुसरीकडे एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.