शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तणाव; रामराजेंकडे निघालेल्या उदयनराजेंना अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:03 IST

खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन नेते मंगळवारी येथील विश्रामगृहावर समोरासमोर भिडण्याची शक्यता होती.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन नेते मंगळवारी येथील विश्रामगृहावर समोरासमोर भिडण्याची शक्यता होती. रामराजे ज्या सूटमध्ये बसले होते, तिकडे बाह्या वर करून निघालेल्या उदयनराजेंना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी वेळीच रोखले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांसमोर राग व्यक्त करून उदयनराजे निघून गेले.सातारा जिल्हा बँकेतील बैठक संपल्यानंतर रामराजे सायंकाळी विश्रामगृहातील ‘अजिंक्यतारा’ या सूटमध्ये बसले होते. याची माहिती मिळताच सायंकाळी पाचच्या सुमारास उदयनराजे हेही विश्रामगृहावर आले. त्यांनी थेट ‘प्रतापगड’ सूट गाठला. ‘उदयनराजे येणार व तणाव वाढणार...’ हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विश्रामगृहावर मोठा पोलीस बंदोबस्त आधीच ठेवला होता.उदयनराजे ‘प्रतापगड’ सूटमधून उठून बाहेर आले. रामराजे ज्या सूटमध्ये बसले होते, तिकडे जायला निघाले तेव्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुत्सद्देगिरी दाखवत पुढे होऊन उदयनराजेंशी शेक हँड करत गप्पा मारायला सुरुवात केली. यावेळी उदयनराजे काही पुटपुटत होते. ‘कसला भगीरथ... याने जिल्ह्याची वाट लावली...,’ असे बोलतच उदयनराजे पुन्हा आपल्या वाहनात जाऊन बसले.दरम्यान, काही दिवसांपासून रामराजे व उदयनराजे या दोन नेत्यांत वाक्युद्ध सुरू आहे. एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यावर दोघांचाही भर असल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक दक्षता घेतली आहे. विशेषत: सातारा व फलटण या दोन शहरांत तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे निघून गेल्यानंतरही विश्रामगृहावर मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. रामराजे निघून गेल्यानंतरच पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला.योग्य वेळी बोलेन - रामराजेकाही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी रामराजेंची भेट घेऊन मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘मी योग्य वेळी बोलेन,’ इतकंच रामराजेंनी स्पष्ट केलं.संदीप पाटील यांची मुत्सद्देगिरीपोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुत्सद्देगिरी दाखविल्याने विश्रामगृहावर काही अघटित घडले नाही. त्यांनी योग्य वेळी बंदोबस्त लावला, तसेच उदयनराजेंशी चर्चा केली, तणाव निवळल्याची चर्चा विश्रामगृहावर सुरू होती.