शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

युवकाच्या खुनानंतर कोरेगावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : नातेवाइकाला दमदाटी केल्याचा जाब विचारल्यामुळे काही युवकांनी कोरेगावच्या नवीन बसस्थानकासमोर एकाला चाकूने भोसकले. साताºयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंभू बबन बर्गे (वय ३०, रा. वेताळगल्ली टेक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान, खुन्यांना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : नातेवाइकाला दमदाटी केल्याचा जाब विचारल्यामुळे काही युवकांनी कोरेगावच्या नवीन बसस्थानकासमोर एकाला चाकूने भोसकले. साताºयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंभू बबन बर्गे (वय ३०, रा. वेताळगल्ली टेक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान, खुन्यांना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधिकाºयांनी समजूत काढल्यानंतर तासाभराने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपनगराध्यक्ष जयवंत पवार यानेच गेम केल्याचे शंभू बर्गे याने मृत्युपूर्वी सांगितले असून, तसे मंदार आबासाहेब बर्गे याने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, श्री केदारेश्वर मंदिराची श्रावणी सोमवारनिमित्त यात्रा होती. जुनी पेठ-केदारेश्वर मंदिर रस्ता परिसरात वास्तव्यास असलेल्या शुभम मोरे याची सायंकाळच्या सुमारास करण बनकर (रा. कळकाई गल्ली) याच्याशी शाब्दिक चकमक झाली. करणने शुभमला शिवीगाळ करत दमदाटीदेखील केली. हा प्रकार शुभमने जवळचा नातेवाईक मंदार बर्गे याला सांगितला. मंदार व त्याच्या मित्रांनी कळाकाई गल्लीत जाऊन करण बनकरला जाब विचारला. त्याचा राग आल्याने करणचा मित्र असलेल्या अर्जुन डेरे याने अक्षय जगदीश बर्गे याच्या पायाला लोखंडी रॉड मारला. त्याच वेळी करण बनकर याने शंभू बबन बर्गे याच्यावर चाकूने वार केला. शंभू याने पहिला वार चुकवला. दुसरा वार मात्र, त्याच्या हाताला चाटून गेला.करण व त्याचे मित्र निघून गेल्यानंतर अक्षय बर्गेला त्याच्या मित्रांनी लक्ष्मीनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाºयांनी शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रात्री साडेनऊच्या सुमारास शंभू बर्गे याने अक्षयची रुग्णालयात विचारपूस केली. त्यानंतर तो नवीन बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेल शिवरत्नकडे गेला.तेथे दुचाकीवरून आलेल्या काही युवकांनी पिछाडीवर तीन वार केले. शंभू हा पाठीमागे वळल्यानंतर त्याच्या उजव्या बरगडीत धारदार चाकूने वार करण्यात आला. हा वार इतका जोरात होता की, चाकू बाहेर निघालाच नाही. रक्ताच्या थारोळ्यात शंभू पडल्याचे पाहिल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले.साताºयाकडे नेले जात असताना रुग्णवाहिकेत शंभू बर्गे हा विव्हळत होता, ‘जयवंत पवार यानेच माझ्यावर गेम केली आहे,’ असे तो रामदास रमेश बर्गे व अक्षय संजय बर्गे यांना सांगत होता. रात्री अकराला त्याच्यावर साताºयातील रुग्णालयात उपचारास सुरुवात केली. मात्र, मध्यरात्री एकच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.अपर पोलिस अधीक्षक विजय पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्मााकर घनवट सकाळी कोरेगाव पोलिस ठाण्यात आले. त्यांनी संशयितांची चौकशी केली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींची विचारपूस केली. पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे तपास करीत आहेत.याप्रकरणी मंदार आबासाहेब बर्गे याने कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...मगच अंत्यसंस्कार..शंभूचा मृत्यू झाल्याचे समजताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भल्या सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तोपर्यंत शंभूचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका बर्गे कुटुंबीय व मित्रांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर आणली. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करा, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. ‘याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, इतर संशयितांचा शोध सुरू आहे, त्यांना लवकरच अटक करू,’ असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी सांगत जमावाला शांत केले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात शंभू बर्गे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.