शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे वादळ माणदेशात घोंगावले

By admin | Updated: March 16, 2017 23:33 IST

हजारो बांधवांचा समावेश : अहिल्या कन्यांकडून अनुसूचित जमाती दाखला मागणीचा तहसीलदारांना अर्ज; क्रांतीची मशाल पेटविली

दहिवडी : सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी ‘एक लढा जातीचा, धनगरांच्या ख्यातीचा’ अशी घोषणा देत हजारो धनगर समाज बांधवांच्या मल्हार क्रांतीचे वादळ गुरुवारी दहिवडी तहसील कार्यालयावर घोंगावले. माण तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने अहिल्या कन्यांनी अनुसूचित जमाती दाखला मागणीचा अर्ज तहसीलदार सुरेखा माने यांच्याकडे सुपूर्द करत आरक्षणाचे सुंबरान मांडले. रणरणत्या उन्हात हजारोंच्या साक्षीने मल्हार क्रांतीची मशाल पेटविण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत ही मशाल तेवत ठेवण्याचा निर्धार समाज बांधवांनी यावेळी केला. धनगर समाजाने अनुसूचित जमातीत समाजाचा समावेश करावा, या मागणीसाठी एल्गार केला होता. त्यानंतर आघाडी सरकार संपून महायुतीची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर युती शासनाला आश्वासनांचा विसर पडला. धनगर बांधवांची मागणी जैसे थे राहिली. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी फक्त घोषणा न देता कृतीशील आंदोलन करण्याचा निर्धार धनगर समाज बांधवांनी केला. त्याचेच पहिले पाऊल म्हणून माणमध्ये प्रत्यक्ष दाखला मागणी अभियानासाठी मल्हार क्रांती मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. दोन महिन्यांपासून या अभिनव आंदोलनाची तयारी सुरू होती. माणमधील वाडी-वस्तीवर जाऊन या आंदोलनाची माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात येत होते. सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी मल्हार क्रांतीच्या आंदोलनाचा एल्गार होणार होता. त्यासाठी संपूर्ण दहिवडी शहर सज्ज झाले होते. जागोजागी पिवळे ध्वज फडकत होते. तर मल्हार क्रांतीचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गुरुवारी सकाळपासूनच तालुका व जिल्ह्याच्या विविध भागांतून धनगर बांधव दहिवडीच्या दिशेने येत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास दहिवडी येथील सिद्धनाथ मंदिरात अहिल्या कन्यांच्या हस्ते सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी युवती, महिला होत्या. त्यांच्या पाठीमागे पुरुष होते. तर सर्वात शेवटी विविध पक्षांचे पदाधिकारी होते. या मोर्चामध्ये मेंढपाळापासून शेतकरी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, तरुण या सर्वांचा सहभाग होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत सिद्धनाथ मंदिरापासून मार्डी चौक, मायणी चौक, फलटण चौक, कर्मवीर पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाजवळ आल्यावर अहिल्या कन्यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर तहसीलदार सुरेखा माने या तहसील कार्यालयासमोर येऊन मोर्चास सामोऱ्या गेल्या.मागील दोन महिन्यांपासून तालुक्यातून भरण्यात आलेले ७५५१ दाखला मागणी अर्ज अहिल्या भगिनींनी तहसीलदार माने यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली. (प्रतिनिधी) नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा... पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली माण व खटावमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे वाहतुकीचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न निर्माण झाला नाही. तसेच दहिवडी नगरपंचायतीने या मोर्चास टँकरने पाणीपुरवठा केला.