शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सात गुंठ्यातील काम त्वरित थांबवा

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

भीमाई स्मारक : विविध संघटनांनी दिला इशारा

सातारा : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हे राष्ट्रीय दर्जाचे व्हावे आणि ते तीन एकर २२ गुंठ्यातच व्हावे. मात्र सध्या सात गुंठ्यात सुरू असलेले स्मारकाचे काम आम्हाला मान्य नसून ते थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ अशी माहिती ‘रिपाइं’चे किशोर तपासे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले, अंकुश भिंगारदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.किशोर तपासे म्हणाले, ‘सध्या असलेली स्मारकाची जागा कोणासही माहिती नव्हती. दलित सेवा संघाने पुढाकार घेऊन ती जागा स्वच्छ केली. सध्या सात गुंठ्यात घातलेला स्मारकाचा घाट मान्य नाही. तसेच स्मारकाची मालकी कोणत्याही एका संस्थेकडे नको. त्यासाठी तीन एकर २२ गुंठे जागा संपादित करण्यात यावी आणि शासनाने स्मारक बांधून देऊन त्याचा ताबा शासनाकडे ठेवावा.’ माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले म्हणाले, ‘पार्थ पोळके यांनी तडजोड करून सात गुंठ्यात स्मारक बांधण्याचा घाट घातला आहे. ते म्हणतात, ‘शासनाचा पैसा नको आम्ही बांधू; परंतु तसे झाल्यास त्यांची मालकी राहणार असून, आम्हाला कोणा एका संस्थेच्या मालकी नको आहे. त्यापेक्षा त्यांनी सहकारी तत्त्वावर स्मारक बांधावे. या जागेत प्लॉट पाडून ते धनदांडग्यांना विकण्यात आले आहेत. तिथे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या तर स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येईल.खासदार उदयनराजे यांनी डीपीडीसीमधून सात कोटी देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे जिल्हाधिकाऱ्यांंना सांगितले आहे.’ माजी नगरसेवक अंकुश भिंगारदेवे यांनी पार्थ पोळके यांच्यावर वर्गणी गोळी करून त्याचा अपहार केल्याचा आरोप केला. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी पोळके यांनी वर्गणी गोळा केली. परंतु ती आजतागयत दिली नाही. तसेच १९८१ मध्ये सातारा बसस्थानकाशेजारील झोपडपट्टी उठवण्यात आली तेव्हा सुध्दा त्यांनी रक्कम गोळा केली. सामाजिक कार्याच्या नावाखाली पोळके हे लोकांना फसवत आहेत, असाही त्यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)स्मारकाची जागा भीमाबाई प्रतिष्ठानची आहे. स्मारकाचे काम सुरू करताना बांधकाम परवानाही घेतला आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली आहे. कोणतेही धार्मिकस्थळ कोणाच्या मालकीचे नसते. हे स्मारक राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. वर्गणी अपहराचा आरोप होत असेल तर माझ्यावर फौजदारी करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होऊन ३० ते ३५ वर्षे झाली. एवढी वर्षे गप्प का. झोपडपट्टीतील लोकांचेही जबाब घ्या. यातील वस्तुस्थिती समोर येईल. हे सर्व आरोप श्रेयवादातून होत आहेत.’- पार्थ पोळके