शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सात गुंठ्यातील काम त्वरित थांबवा

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

भीमाई स्मारक : विविध संघटनांनी दिला इशारा

सातारा : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हे राष्ट्रीय दर्जाचे व्हावे आणि ते तीन एकर २२ गुंठ्यातच व्हावे. मात्र सध्या सात गुंठ्यात सुरू असलेले स्मारकाचे काम आम्हाला मान्य नसून ते थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ अशी माहिती ‘रिपाइं’चे किशोर तपासे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले, अंकुश भिंगारदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.किशोर तपासे म्हणाले, ‘सध्या असलेली स्मारकाची जागा कोणासही माहिती नव्हती. दलित सेवा संघाने पुढाकार घेऊन ती जागा स्वच्छ केली. सध्या सात गुंठ्यात घातलेला स्मारकाचा घाट मान्य नाही. तसेच स्मारकाची मालकी कोणत्याही एका संस्थेकडे नको. त्यासाठी तीन एकर २२ गुंठे जागा संपादित करण्यात यावी आणि शासनाने स्मारक बांधून देऊन त्याचा ताबा शासनाकडे ठेवावा.’ माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले म्हणाले, ‘पार्थ पोळके यांनी तडजोड करून सात गुंठ्यात स्मारक बांधण्याचा घाट घातला आहे. ते म्हणतात, ‘शासनाचा पैसा नको आम्ही बांधू; परंतु तसे झाल्यास त्यांची मालकी राहणार असून, आम्हाला कोणा एका संस्थेच्या मालकी नको आहे. त्यापेक्षा त्यांनी सहकारी तत्त्वावर स्मारक बांधावे. या जागेत प्लॉट पाडून ते धनदांडग्यांना विकण्यात आले आहेत. तिथे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या तर स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येईल.खासदार उदयनराजे यांनी डीपीडीसीमधून सात कोटी देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे जिल्हाधिकाऱ्यांंना सांगितले आहे.’ माजी नगरसेवक अंकुश भिंगारदेवे यांनी पार्थ पोळके यांच्यावर वर्गणी गोळी करून त्याचा अपहार केल्याचा आरोप केला. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी पोळके यांनी वर्गणी गोळा केली. परंतु ती आजतागयत दिली नाही. तसेच १९८१ मध्ये सातारा बसस्थानकाशेजारील झोपडपट्टी उठवण्यात आली तेव्हा सुध्दा त्यांनी रक्कम गोळा केली. सामाजिक कार्याच्या नावाखाली पोळके हे लोकांना फसवत आहेत, असाही त्यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)स्मारकाची जागा भीमाबाई प्रतिष्ठानची आहे. स्मारकाचे काम सुरू करताना बांधकाम परवानाही घेतला आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली आहे. कोणतेही धार्मिकस्थळ कोणाच्या मालकीचे नसते. हे स्मारक राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. वर्गणी अपहराचा आरोप होत असेल तर माझ्यावर फौजदारी करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होऊन ३० ते ३५ वर्षे झाली. एवढी वर्षे गप्प का. झोपडपट्टीतील लोकांचेही जबाब घ्या. यातील वस्तुस्थिती समोर येईल. हे सर्व आरोप श्रेयवादातून होत आहेत.’- पार्थ पोळके