शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

खुजगावमध्ये रास्ता रोको--चारा छावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:29 IST

तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. शेती, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी योजना सुरु कराव्यात, पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप वाया जाणार आहे.

ठळक मुद्देबस्तवडे फाट्यावर ठिय्याटंचाई आंदोलनाची ठिणगीपुढील चार महिने चारा उपलब्ध होणार नाही शेतीसाठीच्या पाणी योजना सुरु कराव्यात,

तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. शेती, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी योजना सुरु कराव्यात, पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप वाया जाणार आहे. त्यामुळे तात्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात, यांसह अन्य मागण्यांसाठी खुजगाव येथील शेतकºयांनी एकत्रित येऊन बस्तवडे फाटी येथे बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केले. यानिमित्ताने टंचाईच्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.शेती, द्राक्षबागांसाठीही पाणी नाही. पाणी योजनांचे काम पूर्ण झालेले नाही. योजना सुरु नाहीत. त्यामुळे पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेला पावसाचा अंदाज खोटा ठरला आहे. खरीप वाया जाणार आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. इथून पुढे पाऊस पडला तरीदेखील, पुढील चार महिने चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, शेतीसाठीच्या पाणी योजना सुरु कराव्यात, यांसह अन्य मागण्यांसाठी खुजगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकºयांनी बस्तवडे फाटी येथे बैलगाड्यांसमवेत रास्ता रोको करुन ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी टंचाई निवारणासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोतिराम जाधव, सुभाष पाटील, सुरेश पाटील, राजाराम पाटील, राधेशाम पाटील, वसंत पाटील, प्रकाश देशमुख, मोहन गायकवाडे, बजरंग कदम, शिवाजी पाटील, बाबासाहेब पाटील, अमृत गायकवाड आदी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुधाकर देशमुख यांना देण्यात आले. आंदोलन शांततेत व्हावे, यासाठी पोलिस निरीक्षक राजन माने यांच्यासह पोलिस घटनास्थळावर उपस्थित होते.तीन वर्षांपासून हुलकावणीतासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या तीन वर्षापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पाणी पातळी खालावली आहे. पिण्यासाठी टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा होत नाही.