शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वप्राथमिक प्रवेशप्रक्रिया थांबवा !

By admin | Updated: May 6, 2016 01:28 IST

जिल्ह्यातील शाळांवर आरोप : ‘आॅनलाईन’साठी खोटी माहिती दिल्याबाबत निवेदन

सातारा : जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांनी फक्त इयत्ता पहिली हेच प्रवेशस्तर असल्याची खोटी माहिती आॅनलाईन अर्जामध्ये सादर केली आहे. या खोट्या माहितीमुळे पूर्वप्राथमिक वर्गांची माहिती शासनापासून लपवली गेली आहे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे इरफान कच्छी यांनी दिले आहे. बालकांचा सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी सर्व विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळा, सीबीएसई, आयबी, आयसीएससी, आयजीसीएससी, या मंडळांशी संलग्न शाळा, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण अंतर्गत प्रवेशस्तरावर होते. कायद्यानुसार पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी व ज्युनिअर के. जी. व सिनिअर के. जी. आणि पहिली असे २ प्रवेशस्तर मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. या बालकांकडून कसलीही फी अथवा शुल्क आठवीपर्यंत घेता येत नाही. सध्या जिल्ह्यात २०१६-२०१७ च्या शैक्षणिक वर्षासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रथम सातारा जिल्ह्यातील शाळांना त्यांच्या प्रवेशस्तराची माहिती व त्यानुसार असलेल्या २५ टक्के राखीव जागा व पहिलीच्या २५ टक्के राखीव जागांची माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर भरून नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील २१० शाळांनी संकेतस्थळावर माहिती भरून २५ टक्के आरक्षणासंबंधी शाळेची नोंदणी केली. यातील एकमेव शाहू अ‍ॅकॅडमी ही शाळा वगळता जवळपास सर्वच शाळांनी पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी, ज्युनिअर के.जी. व सिनियर के. जी. या प्रवेशस्तराची माहिती सादर केली नाही, ही माहिती शासनापासून लपवून त्यांनी शैक्षणिक हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचे चित्र दिसत आहे.संबंधित शाळांना शासनाने पूर्व प्राथमिक व प्रवेशस्तरावर उपलब्ध असलेल्या वर्गांची खरी माहिती देण्याचे आवाहन करावे आणि दि. ७ मे रोजी आॅनलाईन प्रवेशाची मुदत संपत असल्याने ही मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे इरफान कच्छी यांनी केली आहे. संबंधित शाळांची पूर्वप्राथमिक स्तराची खरी माहिती शासनाच्या संकेतस्थळावर सादर केल्यानंतर प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी. ज्या शाळा खरी माहिती भरणार नाहीत, त्यांची मान्यता रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी पोलिस कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)... अन्यथा शाळेची मान्यताही रद्दजिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अजूनही दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी २५ टक्के कोट्यातून मोफत शिक्षण दिले जात नाहीत. याविषयी पालकांनी शाळा व्यवस्थापनाला विचारले तर अशी योजना फक्त अनुदानित शाळेत राबविली जात असल्याची माहिती दिली जाते. वास्तविक अनुदानित व विनाअनुदानित असे प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात या घटकातील २५ टक्के विद्यार्थी भरणे बंधनकारक आहे. असे न केल्यास संबंधित शाळेची मान्यताही रद्द होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.