शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

खचलेल्या पुलाला दगडाचा भराव

By admin | Updated: March 11, 2017 12:49 IST

साप-रहिमतपूर वाहतुकीला अडथळा : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

खचलेल्या पुलाला दगडाचा भरावसाप-रहिमतपूर वाहतुकीला अडथळा : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रहिमतपूर : साप-रहिमतपूर मार्गावरील वेताळ माळ येथील ओढ्यावरी पूल गतवर्षी ओढ्याला आलेल्या पावसाच्या पाण्याचा पुरामुळे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून खचलेल्या ठिकाणी दगडे टाकून काम आटोपते घेतले. पुलाला ओबडधोबड दगडाच्या टाकलेल्या भरावामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभागाच्या दुलर्क्षामुळे संपूर्ण पुलालाच धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी उन्हाळ्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे साप-रहिमतपूर दरम्यानच्या वेताळ माळ येथील ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलाची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी साप ग्रामस्थांनी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. काही दिवसांनी बांधकाम विभागातून एक-दोन कर्मचारी येऊन बाजूचीच दगडे खचलेल्या ठिकाणी टाकून निघून गेले. खचलेल्या ठिकाणी योग्यपद्धतीने भरावाचे काम न केल्याने पुलालाच धोका निर्माण झाला आहे. पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने वाहनांना ये-जा करताना अडचण येत आहे. त्यामुळे या मधल्या मार्गाने रहिमतपूरला होणारा वाहतूक थांबली आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, उन्हाळी पावसात ओढ्याला पावसाच्या पाण्याचा पूर येण्याची शक्यता असते. तत्काळ या पुलाची दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती न केल्यास संपूर्ण पूलच वाहून जाण्याची शक्यता आहे. लाखो रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या पुलाची वाट केवळ डागडुजीअभावी लावू नये. अन्यथा याला बांधकाम विभाग जबाबदार असेल. तरी तत्काळ या पुलाची दुरुस्ी करावी, अशी मागणी साप ग्रामस्थांतून होत आहे.