शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST

सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच पटींनी वाढत आहे. याचे मुख्य ...

सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच पटींनी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरण झालेले रुग्ण कोरोनातून सहीसलामत बाहेर येत आहेत. लसीकरणानंतर एकाही व्यक्तीचा जिल्ह्यात मृत्यू झाला नसल्याचे समोर आले असून ही बाब आरोग्य विभागासाठी मोठी सकारात्मक ठरली आहे.

जिल्ह्यात लसीकरणाला एक मार्चला प्रारंभ झाला. तेव्हा पहिल्या टप्प्यात जवळपास तीन लाख लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर २८ दिवसानंतर या लोकांनी पुन्हा दुसरा डोस घेतला. यादरम्यान लस घेऊनही जिल्ह्यात एकूण २२ जण कोरोना बाधित आढळून आले. मात्र या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत उत्तम राहिली. त्यामुळे त्यांना कोरोना बाधित काळामध्ये कोणताही त्रास जाणवला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्याची गरज भासली नाही. घरच्या घरीच त्यांच्यावर औषधोपचार केला गेला. यातून हे सर्व रुग्ण सुखरूप बाहेर पडले. या लोकांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरले. यामुळे एकाही व्यक्तीचा बळी गेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहेच. शिवाय आरोग्य विभागाने दोन महिन्यांपासून घेतलेले परिश्रमही फळाला आले.

लसीकरणाचा वेग जिल्ह्यात सध्या मंदावला आहे कारण लसीचा तुटवडा वारंवार होत आहे. खरंतर ही कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी आता लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे शासनालाही पटले आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून लसीचे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे ही मोहीम दोन वेळा थांबवावी लागली.

चौकट :

पहिल्या डोस नंतर जिल्ह्यात केवळ एक टक्का पॉझिटिव्ह

जिल्ह्यात लसीकरणामुळे अनेकजण कोरोनापासून बचावले. विशेष म्हणजे केवळ एक टक्काच लोकांना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यांना फारसा त्रास झाला नाही. अगोदर लस घेतल्यामुळे हे लोक मनानेही खंबीर झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली नाही. सुरूवातीला अनेक जणांनी लस घेण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्यानंतर लोकांनी पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी केली.

चौकट: लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी होतो

सुरुवातीच्या काळामध्ये लसीबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होती. त्यामुळे लोक लस घेताना मागेपुढे पाहत होते. परंतु जसे लसीचे महत्व लोकांना समजलं. तशी लोक लस घेण्यासाठी पुढे येऊ लागली. कोरोनाच्या लाटा अजून किती येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे यावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण हाच असल्याचे आरोग्य विभागही ठामपणे सांगत आहे.

चौकट: दोन्ही डोस घेतल्यानंतर जिल्ह्यात एक टक्का पॉझिटिव्ह

कोरोना बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असली तरी यामध्ये ज्यांनी लस घेतली नाही त्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत असे लोक केवळ एक टक्काच बाधित आढळून येत आहेत.

कोट ः

मी दोन्ही लसीचे डोस घेतले होते. मात्र मी कोरोना बाधित आलो. परंतु मला कसलाही त्रास झाला नाही. ना रुग्णालयात जावे लागले ना कसली चिंता करावी लागली. हे केवळ लसीकरणामुळे शक्य झाले.

अनिकेत जाधव, सातारा