शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:35 IST

सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच पटींनी वाढत आहे. याचे मुख्य ...

सातारा: जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच पटींनी वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरण झालेले रुग्ण कोरोनातून सहीसलामत बाहेर येत आहेत. लसीकरणानंतर एकाही व्यक्तीचा जिल्ह्यात मृत्यू झाला नसल्याचे समोर आले असून ही बाब आरोग्य विभागासाठी मोठी सकारात्मक ठरली आहे.

जिल्ह्यात लसीकरणाला एक मार्चला प्रारंभ झाला. तेव्हा पहिल्या टप्प्यात जवळपास तीन लाख लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर २८ दिवसानंतर या लोकांनी पुन्हा दुसरा डोस घेतला. यादरम्यान लस घेऊनही जिल्ह्यात एकूण २२ जण कोरोना बाधित आढळून आले. मात्र या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत उत्तम राहिली. त्यामुळे त्यांना कोरोना बाधित काळामध्ये कोणताही त्रास जाणवला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्याची गरज भासली नाही. घरच्या घरीच त्यांच्यावर औषधोपचार केला गेला. यातून हे सर्व रुग्ण सुखरूप बाहेर पडले. या लोकांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरले. यामुळे एकाही व्यक्तीचा बळी गेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहेच. शिवाय आरोग्य विभागाने दोन महिन्यांपासून घेतलेले परिश्रमही फळाला आले.

लसीकरणाचा वेग जिल्ह्यात सध्या मंदावला आहे कारण लसीचा तुटवडा वारंवार होत आहे. खरंतर ही कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी आता लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे शासनालाही पटले आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून लसीचे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे ही मोहीम दोन वेळा थांबवावी लागली.

चौकट :

पहिल्या डोस नंतर जिल्ह्यात केवळ एक टक्का पॉझिटिव्ह

जिल्ह्यात लसीकरणामुळे अनेकजण कोरोनापासून बचावले. विशेष म्हणजे केवळ एक टक्काच लोकांना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यांना फारसा त्रास झाला नाही. अगोदर लस घेतल्यामुळे हे लोक मनानेही खंबीर झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली नाही. सुरूवातीला अनेक जणांनी लस घेण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्यानंतर लोकांनी पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी केली.

चौकट: लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी होतो

सुरुवातीच्या काळामध्ये लसीबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होती. त्यामुळे लोक लस घेताना मागेपुढे पाहत होते. परंतु जसे लसीचे महत्व लोकांना समजलं. तशी लोक लस घेण्यासाठी पुढे येऊ लागली. कोरोनाच्या लाटा अजून किती येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे यावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण हाच असल्याचे आरोग्य विभागही ठामपणे सांगत आहे.

चौकट: दोन्ही डोस घेतल्यानंतर जिल्ह्यात एक टक्का पॉझिटिव्ह

कोरोना बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असली तरी यामध्ये ज्यांनी लस घेतली नाही त्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत असे लोक केवळ एक टक्काच बाधित आढळून येत आहेत.

कोट ः

मी दोन्ही लसीचे डोस घेतले होते. मात्र मी कोरोना बाधित आलो. परंतु मला कसलाही त्रास झाला नाही. ना रुग्णालयात जावे लागले ना कसली चिंता करावी लागली. हे केवळ लसीकरणामुळे शक्य झाले.

अनिकेत जाधव, सातारा