शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाण्याच्या शोधासाठी डोंगरदऱ्यातून पायपीट!

By admin | Updated: March 15, 2016 00:39 IST

जलस्रोत आटले : पाटण तालुक्यातील डोंगरी भागातील स्थिती

बाळासाहेब रोडे -- सणबूर --ढेबेवाडी विभागातील डोंगरदऱ्यात वसलेल्या भोसगाव-आंब्रुळकरवाडी गावाला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून भटकंती करावी लागत आहे. बायका-मुलांचा जीव धोक्यात घालून ग्रामस्थ खोल दरीत उतरुन पायथ्याला असलेल्या झऱ्यातील पाणी भरावे लागत आहे.ढेबेवाडीपासून अवघ्या काही अंतराव भोसगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पश्चिमेस आंब्रुळकरवाडी डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. या गावची लोकसंख्या सुमारे सहाशे आहे. या गावातील बहुतांशी लोक कामधंद्यासाठी पुणे-मुंबईत आहेत. गावची यात्रा, लग्न सोहळा, उन्हाळी सुटी, सण यासाठी चाकरमानी गावाकडे येतात. ही वस्ती डोंगरात वसल्यामुळे पाणीटंचाई कधीही जाणवत नव्हती. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊस कमी पडत असल्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.आंब्रुळकरवाडी डोंगरावर असल्यामुळे भोसगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी तेथे पोहोचत नाही. येथील लोकांना पाणी मिळावे, यासाठी डोंगरातील पाण्याच्या स्रोतांवर चेंबर बांधले आहेत. दोन-तीन किलोमीटर परिसरातून पाणी आणावे लागत आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे पाण्याचे स्रोतही आटू लागले आहेत.या गावाचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा, यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडले; पण प्रश्न जैसे थे राहिला आहे. प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. पाण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस डोंगरदऱ्यात भटकावे लागत आहे. वन्यप्राण्यांची भीती असते. पण करणार काय? प्रत्येक वर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शासनाने आमचा पाणीप्रश्न सोडवावा.- तानाजी आंब्रुळकर, नागरिकझऱ्यांचा शोध सुरू...गावातील कूपनलिका, विहिरीचे पाणी आटल्याने ग्रामस्थांना डोंगर परिसरातील झरे शोधत हिंडावे लागत आहे. जीव धोक्यात घालून झऱ्यातील पाणी भरावे लागत आहे. छोट्या भांड्याने घागरी भराव्या लागत आहेत. पाण्यासाठी झऱ्यावर रांगा लागत आहेत. तासन्तास पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे.पाणीटंचाईमुळे चाकरमानी शहरात परतलेसण समारंभ, लग्न सोहळा, यात्रा यासाठी गावी आलेले चाकरमानी पिण्याचे पाणी नसल्यामुळे पुन्हा शहराकडे परतू लागले आहेत. सुटीसाठी आलेल्या चाकरमान्यांनाही पाण्यासाठी डोंगरकपारीतून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.