शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

श्रमिक मुक्ती दलाचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन

By admin | Updated: April 22, 2015 00:27 IST

भारत पाटणकर : धरणातील पाणी अडवणार

सातारा : आजपर्यंत शासनाने केवळ आश्वासने दिली. विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. राज्यात तीन लाख कुटुंब विविध प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी नवीन मागण्या नाही तर मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांत ६ एप्रिलपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. तरीही सरकाराने दखल घेतली नाही. त्यामुळे बुधवार दि. २२ पासून राज्यात विविध ठिकाणच्या धरणातील पाणी अडविण्यात येणार आहे. असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.डॉ. पाटणकर म्हणाले, ६ एप्रिल पासून राज्यातील ११ जिल्ह्यांत्र बेमुद ठिय्या आंदोलन सुरू आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तुमची बैठक लावतो. तुम्ही आंदोलन स्थगित करा. असे सांगितले होते. परंतु त्यावेळेस आम्ही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही, असे सांगितले होते. आजअखेर मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावले नाही किंवा चर्चाही केली नाही . यावरुन आमचा निर्णय योग्य होता, हे आता स्पष्ट झाल आहे. या प्रकारामुळेच आमचा शासनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करणे अपरिहार्य झाले आहे. मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरुन येऊन बरेच दिवस झाले. या काळात ते राज्याच्या विविध भागात गेले, कार्यक्रमांना हजेरी लावली परंतु ज्यांनी राज्याच्या विकासासाठी त्याग केला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. राज्यात जवळपास ३ लाख कुटुंबे म्हणजे १५ लाखाहून अधिक माणसे विविध प्रकल्पग्रस्त आहेत. एवढया मोठया लोकसंख्येचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांमध्ये नाही. कोणत्या नवीन मागण्यांसाठी आंदोलन नाही तर निघालेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. ती व्हावी ही आचमी प्रमुख मागणी आहे. या मागणीकडेही सरकार गांभीर्याने बघत नाही. कोयना धरण होऊन इतके वर्ष झाले परंतु त्यांचेही अजून पूर्ण पुनर्वसन झाले नाही. या अंमलबजावणीसाठी एवढा उशीर लागण्याचे कारणच काय त्यामुळे आता बुधवारपासून राज्यात विविध ठिकाणी धरणातील पाणी अडवले जाणार आहे. (प्रतिनिधी)अभयारण्यातील पर्यटकांनाही अडविणार सातारा जिल्हयातील तारळी, उरमोडी, कोयना धरणातील पाणी अडवण्यात येणार आहे. तसेच सांगली आणि कोल्हापूरमधील वारणा धरण तसेच चांदोली अभयारण्याच्या गेटवर पर्यटकांना अडविण्यात येईल. कोल्हापूरच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगड येथे सुरू असलेल्या धरणाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरमधील उजनी धरणातून तसेच मराठवाडयातील जायकवडी धरणातून पाणी सोडून देण्यात येणार नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात उरमोडी, तारळी, वांगसाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही.