शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर उद्योग सर्व बाजूंनी अडचणीत

By admin | Updated: November 1, 2015 23:47 IST

हर्षवर्धन पाटील : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामास प्रारंभ

भुर्इंज : यंदा राज्यातील साखर उद्योग सर्व बाजंूनी अडचणीत सापडला आहे. निसर्ग कोपलेला आहे, दुष्काळाचे प्रचंड सावट राज्यावर आहे. राज्याच्या सर्व धरणांमधील पाणी आटले आहे. पाण्याचे वाद सुरू झालेले आहेत. या सर्व अडचणींतून कसा मार्ग काढायचा हा साखर कारखानदारांसमोर मोठा प्रश्न आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत काडसिद्धेश्वर स्वामींचा आशीर्वाद साखर उद्योगाला आधार ठरावा,’ अशी सदिच्छा माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळित हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान, कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, डॉ. नीलिमा भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रल्हादराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. साखर उद्योग बंद पडला तर पुन्हा सुरू होईल की नाही, सांगता येत नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारी उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त करून हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘राज्याच्या विविध धरणांमध्ये सुमारे एक लाख सत्त्याहत्तर हजार घनमीटर पाणी अडविण्यात येते. धरणांसह नदी, नाले, विहिरींमधील नव्वद टक्के पाणी हे ऊस पिकासाठी लागते. हा नवा जावईशोध जलतज्ज्ञांनी लावला आहे, हे दुर्दैवी आहे. राज्यात पस्तीस लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या वाचाळविरांनी आता चर्चा थांबवावी आणि एकदाच ऊस पाण्याबाबतचे निश्चित धोरण ठरवावे. गेल्या हंगामात नऊशे पस्तीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन शंभर लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र बाजारात घसरलेल्या साखरेच्या दरामुळे साखर उद्योगाला दहा हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला. साखर धंद्यातून केंद्र व राज्य सरकारला तीन ते पाच हजार कोटी दरवर्षी कररूपाने मिळतात; मात्र सरकारने म्हणावी तशी व योग्य वेळी मदत केली नाही. यंदाच्या हंगामात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार अतिशय चिंतेत आहेत. त्यांचा धीर सुटू लागला आहे.’ प्रास्ताविकात मदन भोसले म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत विविध कारणांमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीतून जात असतानाही केवळ साखर उत्पादनावर न थांबता अनेक पूरक उद्योग उभारल्यामुळेच शेतकऱ्यांना विनाकपात एकरकमी एफआरपी देऊ शकलो. साखर उत्पादन खर्च व साखरेच्या दरात एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंतची तफावत असतानाही शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यात सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही कमी पडलो नाही. यंदाच्या हंगामातही अनेक अडचणी आहेत. मात्र एकरकमी एफआरपी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यावेळी किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. दत्तात्रय शेवते व विकास कदम यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. (वार्ताहर)