शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

राजकारणापायी राज्याला वेठीस धरू नये : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

सातारा : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जे नेतृत्व करायला हवे होते. राज्यांना सोबत घ्यायला हवे होते, ते झाले ...

सातारा : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जे नेतृत्व करायला हवे होते. राज्यांना सोबत घ्यायला हवे होते, ते झाले नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता होती. तज्ज्ञ सांगत होते. मात्र केंद्र सरकार कुंभमेळा, निवडणुका यामध्येच गुंतलेले होते, केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी राजकारण आणत आहे. आता हातघाईवर आलेल्या परिस्थितीमध्ये केंद्राने राज्य सरकारला वेठीस धरू नये, असा इशारा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

येथील काँग्रेस कमिटीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट येईल, याचा अंदाज होता. या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांचे उत्पादन केंद्र सरकारने वाढवायला पाहिजे होते. देशाचे नेते यांची सर्व जबाबदारी आहे. केंद्र सरकारने गोंधळलेल्या अवस्थेत लसीकरणाचा निर्णय घेतला गेला. तज्ञ सांगत होते. निर्णय घेण्याची क्षमता असूनही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे जनतेला त्रास झाला. सरकारची यंत्रणा तोकडी पडताना दिसत आहे. लोकांचे प्राण नाहक चालू आहेत, केंद्राची ही सर्व जबाबदारी आहे.

विरोधी पक्षाने टीका केली तर गैर नाही. जे प्रकार पुढे येत आहेत. खासगी व्यक्तीने रेमडेसिविरचा साठा केला, लसींचा साठा केला, हे खरे आहे. कितीही उच्च पदस्थ असला तर मोठ्या जबाबदार पदावर बसणाऱ्यावर कारवाई का होऊ नये.

काँग्रेस कमिटीच्यावतीने कोविड मदत केंद्र सुरू केले. प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून संपूर्ण राज्यात मदत करत आहोत. आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारलाच ऑक्सिजन, रेमडेसिविरप्रमाणे केंद्रातून लसींचा साठा आला नाही तर मागणी आणि पुरवठ्यात तफावत पडण्याची भीती आहे. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा साठा केला असावा म्हणूनच तर मोठा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयाप्रमाणे लसी मिळाल्या नाहीत तर अवघड परिस्थिती ओढवेल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये सुरू केलेल्या कोरोना मदत केंद्राचे उद्घाटन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. (छाया : जावेद खान)