शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

राजकारणापायी राज्याला वेठीस धरू नये : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST

सातारा : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जे नेतृत्व करायला हवे होते. राज्यांना सोबत घ्यायला हवे होते, ते झाले ...

सातारा : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जे नेतृत्व करायला हवे होते. राज्यांना सोबत घ्यायला हवे होते, ते झाले नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता होती. तज्ज्ञ सांगत होते. मात्र केंद्र सरकार कुंभमेळा, निवडणुका यामध्येच गुंतलेले होते, केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी राजकारण आणत आहे. आता हातघाईवर आलेल्या परिस्थितीमध्ये केंद्राने राज्य सरकारला वेठीस धरू नये, असा इशारा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

येथील काँग्रेस कमिटीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट येईल, याचा अंदाज होता. या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांचे उत्पादन केंद्र सरकारने वाढवायला पाहिजे होते. देशाचे नेते यांची सर्व जबाबदारी आहे. केंद्र सरकारने गोंधळलेल्या अवस्थेत लसीकरणाचा निर्णय घेतला गेला. तज्ञ सांगत होते. निर्णय घेण्याची क्षमता असूनही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे जनतेला त्रास झाला. सरकारची यंत्रणा तोकडी पडताना दिसत आहे. लोकांचे प्राण नाहक चालू आहेत, केंद्राची ही सर्व जबाबदारी आहे.

विरोधी पक्षाने टीका केली तर गैर नाही. जे प्रकार पुढे येत आहेत. खासगी व्यक्तीने रेमडेसिविरचा साठा केला, लसींचा साठा केला, हे खरे आहे. कितीही उच्च पदस्थ असला तर मोठ्या जबाबदार पदावर बसणाऱ्यावर कारवाई का होऊ नये.

काँग्रेस कमिटीच्यावतीने कोविड मदत केंद्र सुरू केले. प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून संपूर्ण राज्यात मदत करत आहोत. आता केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारलाच ऑक्सिजन, रेमडेसिविरप्रमाणे केंद्रातून लसींचा साठा आला नाही तर मागणी आणि पुरवठ्यात तफावत पडण्याची भीती आहे. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा साठा केला असावा म्हणूनच तर मोठा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयाप्रमाणे लसी मिळाल्या नाहीत तर अवघड परिस्थिती ओढवेल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये सुरू केलेल्या कोरोना मदत केंद्राचे उद्घाटन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. (छाया : जावेद खान)