शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

महाराष्ट्राला वीज पुरवणाऱ्या कोयनेच्या सुरक्षेसाठी राज्य शासन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

पाटण : ‘कोयना धरणाच्या पाण्यापासून तयार होणारी वीज ही संपूर्ण महाराष्ट्राला पुरविण्यात येते. त्यामुळे वीजनिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या ...

पाटण : ‘कोयना धरणाच्या पाण्यापासून तयार होणारी वीज ही संपूर्ण महाराष्ट्राला पुरविण्यात येते. त्यामुळे वीजनिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन गंभीर आहे,’ असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कोयना धरणाच्या सुरक्षेची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवदौलत बँकेचे संचालक अशोक पाटील, धोंडिराम भोमकर, अभिजित पाटील, बबनराव भिसे, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, तहसीलदार योगेश टोमपे, कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन नितीन पोतदार, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘कोयनानगर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असून देश-विदेशांतून या ठिकाणी पर्यटक भेटी देत असतात. कोयनानगरसह या परिसरातील सुमारे दहा किलोमीटर परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी पर्यटन विकास आराखडा राज्य शासनाकडून मंजूर केला आहे. याअंतर्गत कामे प्रगतीत असल्याने येथील निसर्गसौंदर्यांमध्ये अधिकची भर पडत आहे. अस्तित्वात असलेल्या पोलीस चौक्यांच्या इमारती या जुन्या आहेत. त्या कालबाह्य झालेल्या आहेत. कोयनानगर येथे प्रतिवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणांत पाऊस पडत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोयना धरण परिसरातील सुरक्षेच्यादृष्टीने उभारलेले लोखंडी टेहाळणी मोर्चे हे जुने आहेत. कोयना धरणासाठी चांगली सुरक्षा पुरविण्याच्यादृष्टीने पोलीस चौक्यांच्या इमारती व टेहाळणी मोर्चे यांची तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेला अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्यासह पोलीस चौक्यांची पुनर्बांधणी करण्याकरीता तातडीने निधी मंजूर होण्याकरीता आवश्यक असलेला प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे.

पोलीस चौक्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्यशासनाकडून निधी मंजूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन निधी मंजूर करणार आहे,’ असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.