शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राज्य शासन ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:39 IST

वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही ...

वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास १४ घरांची हानी झाली. तसेच अनेक जनावरेदेखील मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या समवेत या गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तिंना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्री पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांचे सांत्वन केले. दरम्यान, जांभळी येथील खचलेल्या जमिनीचीदेखील त्यांनी पाहणी केली. जांभळी यानंतर त्यांनी बोटीतून जोर, गोळेगांव, गोळेवाडी गावासह भातशेती, पडलेली घरे, वाहून गेलेले बंधारे यांचा आढावा घेतला. पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड तणावाखाली वावरावे लागते. नैसर्गिक आपत्तीचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो. जोर, गोळेगांव, गोळेवाडी या गावांमध्ये राहण्याची सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे देवरुखवाडीप्रमाणे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, संजय शिंदे उपस्थित होते.

फोटो : २७ भिलारे

पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यातील देवरुखवाडी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीचा आढावा घेतला.