शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राज्य शासन ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:39 IST

वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही ...

वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास १४ घरांची हानी झाली. तसेच अनेक जनावरेदेखील मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या समवेत या गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तिंना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्री पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांचे सांत्वन केले. दरम्यान, जांभळी येथील खचलेल्या जमिनीचीदेखील त्यांनी पाहणी केली. जांभळी यानंतर त्यांनी बोटीतून जोर, गोळेगांव, गोळेवाडी गावासह भातशेती, पडलेली घरे, वाहून गेलेले बंधारे यांचा आढावा घेतला. पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड तणावाखाली वावरावे लागते. नैसर्गिक आपत्तीचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो. जोर, गोळेगांव, गोळेवाडी या गावांमध्ये राहण्याची सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे देवरुखवाडीप्रमाणे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, संजय शिंदे उपस्थित होते.

फोटो : २७ भिलारे

पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यातील देवरुखवाडी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीचा आढावा घेतला.