शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राज्य शासन ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:39 IST

वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही ...

वाई : देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्तांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असून, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

वाई तालुक्यातील देवरुखवाडी (कोंडावळे) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जवळपास १४ घरांची हानी झाली. तसेच अनेक जनावरेदेखील मृत्यूमुखी पडली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या समवेत या गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तिंना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्री पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांचे सांत्वन केले. दरम्यान, जांभळी येथील खचलेल्या जमिनीचीदेखील त्यांनी पाहणी केली. जांभळी यानंतर त्यांनी बोटीतून जोर, गोळेगांव, गोळेवाडी गावासह भातशेती, पडलेली घरे, वाहून गेलेले बंधारे यांचा आढावा घेतला. पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड तणावाखाली वावरावे लागते. नैसर्गिक आपत्तीचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो. जोर, गोळेगांव, गोळेवाडी या गावांमध्ये राहण्याची सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे आमचे देवरुखवाडीप्रमाणे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, वाई पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, संजय शिंदे उपस्थित होते.

फोटो : २७ भिलारे

पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यातील देवरुखवाडी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीचा आढावा घेतला.