शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

माणगंगेच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या परिक्रमेस प्रारंभ

By admin | Updated: February 23, 2015 00:25 IST

लोकसहभागाची गरज : १६५ किलोमीटर नदीकाठचा होणार अभ्यास

सातारा : माणगंगेच्या पुनरूज्जीवनासाठी लोकचळवळ अधिक प्रभावी व्हावी, यासाठी दुसरी परिक्रमा सुरू झाली आहे. परिक्रमेत माणगंगा सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, उपाध्यक्ष डॉ. विजय जाधव, सचिव प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य संभाजी माळी, प्रा. अशोक शिंदे, गजानन बनकर, विठ्ठल चव्हाण, डॉ. बी. आर. फुले, बाळासाहेब सावंत, बसवेश्वर पाटणे, मोहन बुंजकर तसेच श्रीराम नानल, कविता म्हेत्रे, सुनील सूर्यवंशी, रूपेश कदम यांचा सहभाग आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्या वतीने २०१० मध्ये पहिली परिक्रमा पूर्ण झाली. त्यामध्ये नदीची पूर्वीची भौगोलिक स्थिती, सद्याची दुरवस्थ यामधील तफावतीचा अभ्यासदौरा करून विविधांगी निरीक्षणे केली. त्याचा अहवाल तयार करून माणगंगेच्या विकासासाठी उपाययोजनांचा त्यात समावेश केला होता. परंतु नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम शासन किंवा प्रशासनावर न सोपविता त्यात लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे असल्यामुळे दुसऱ्या परिक्रमा सुरू करण्यात आली आहे.पहिल्या परिक्रमेतून व लोकप्रबोधनातून उगमस्थळाचे ठिकाण, माण, मलवडी, म्हसवड, वाढेगाव आदी ठिकाणी कामे हाती घेतली आहेत. नदीपात्रात स्वच्छता, वृक्षलागवड, बंधारे दुरुस्ती, वाळू उपशावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे सुरू झाली आहेत. याचे महत्त्व नागरिकांना समजले पाहिजे. हाच दुसऱ्या परिक्रमेचा हेतू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)परिक्रमेचा दिनक्रमबुधवार, दि. १८ फेब्रुवारीपासून परिक्रमा सुरू झाली आहे. सोमवार, दि. २३ रोजी सकाळी सात वाजता म्हसवड ते राजेवाडी अशी १५ किलोमीटर अंतरात काम होणार आहे. दि. २४ रोजी राजेवाडी ते दिघंची, दि. २५ रोजी दिघंची ते बलवडी, दि. २६ रोजी बलवडी ते वाटंबरे, दि. २७ रोजी वाटंबरे ते वाढेगाव, दि. २८ रोजी वाढेगाव ते देवळे, दि. १ मार्च रोजी देवळे ते ढवळस आणि दि. २ रोजी ढवळस ते सरकोली अशी एकूण १६५ किलोमीटर अंतरात अभ्यास परिक्रमा होणार आहे.यामुळे झाली नदीची दुरवस्थानदीपात्राचे मूळक्षेत्र अस्तित्वात नाहीउगमस्थळाच्या डोंगरदऱ्यात जी वृक्षराजी होती, ती राहिली नाहीनदीच्या दुतर्फा असणारी झाडे राहिली नाहीतउत्पन्न देणारी पर्यावरण समतोल राखणारे झाडे ठेवली नाहीतवाळू उपशामुळे पाण्याचे स्त्रोत संपलेउपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन केले नाहीउपयोग कमी, तोटे जास्त असणारे बंधारे बांधले