शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
4
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
5
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
6
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
7
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
8
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
9
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
10
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
11
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
12
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
13
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
14
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
15
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
16
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
17
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
18
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
19
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
20
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
Daily Top 2Weekly Top 5

कृषीसेवा केंद्रे, बँका सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:43 IST

वाई : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे सततचा लॉकडाऊन असल्यामुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वाई तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णांची ...

वाई :

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे सततचा लॉकडाऊन असल्यामुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वाई तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आवाक्यात येण्यासाठी प्रशासनाने १५ एप्रिलपासून संपूर्ण वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.

येत्या १५ दिवसांत खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजाला खते व बी-बियाणांची अत्यंत गरज भासणार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी प्रमाणात खते, औषधे खरेदी करावी लागतात. काहींना दुकानदार उधारीवर देत असतात. तसेच व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प असून, मुलांचे पुढील शैक्षणिक प्रवेश सुरू होणार असून, त्यांनाही समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारी व लॉकडाऊन कधी थांबेल व संपेल, याची कोणालाही ठोसपणे शाश्वती देता येत नाही. त्यामुळे येथील बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा वाई प्रशासनाने गांभीर्याने विचार करून कोरोनाच्या नियम अटींवर वाई तालुक्यातील कृषी सेवा केंद्र व मर्यादित उपस्थिती व मर्यादित वेळेत बँका सुरू करण्याची मागणी बळीराजासह व्यावसायिक, नागरिकांकडून केली जात आहे.

वाईच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त व लवकर सुरू होत असल्याने येथील शेतकरी धूळवाफेवर पेरणी करतो तसेच पश्चिम भागात भाताचे पीक हे प्रमुख पीक असल्याने पहिल्या पावसातच भाताचे बियाणे (तरवे) जमिनीच्याआड करावे लागतात. त्यासाठी त्याला खरीप हंगामाच्या पंधरा दिवस अगोदर खते व बी-बियाणे घरपोच करावे लागते. कडक लॉकडाऊनमुळे तालुक्यातील सर्व कृषीसेवा केंद्रे बंद असल्याने बळीराजाला खते व बी-बियाणे काहीही खरेदी करता आलेले नाही. याचीही शासनाने कुठे तरी दखल घेऊन कृषीसेवा केंद्र उघडून बळीराजाला खरीप हंगामाचा दिलासा द्यावा, अशी साद घातली जात आहे.

कोट..१

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी नियम, अटींवर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर वाई तालुक्यामधील कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यात यावीत. वाईचा पश्चिम भाग दुर्गम असून आजच्या परिस्थितीमध्ये दळणवळणाची मोठी समस्या आहे.

-सयाजी पिसाळ

कोट..२

१५ एप्रिलपासून बँका बंद असल्यामुळे व्यावसायिक, नागरिक यांची अनेक कामे खोळंबली आहेत. बँका बंद, एटीएम मशीनही अनेकवेळा बंद असल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वाई शहरातील बँका कोरोनाच्या नियमांचे पालन करून मर्यादित कर्मचाऱ्यांवर चालू करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा.

- दत्तात्रेय मोझर, व्यावसायिक, वाई