शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या प्रवासाला ‘शिक्क्यांचे’ अडथळे!

By admin | Updated: October 15, 2015 00:31 IST

एसटी कंडक्टरांचा अजब नियम : ओळखपत्र चालत नसल्याचा फतवा

सागर गुजर - सातारा -शासनाचे वाहन म्हणून सर्वसामान्यांसाठी आधार ठरणारी एसटी सध्या अपंगांवर नाराज झाल्याचे चित्र आहे. अपंगांना एसटी प्रवासात सवलत म्हणून देण्यात आलेले ओळखपत्र चालत नसल्याचा अलिखित फतवा काही वाहकांकडून काढला गेला आहे. या ओळखपत्रावर ‘कायमस्वरूपी’ हा शिक्का आणण्याचा अजब कारभार सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार अपंग एसटीच्या सवलतीचा लाभ घेत आहे. अपंग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मिळते. या आधारावर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून अपंगांना एक ओळखपत्र मिळते. अपंगत्व ४० टक्क्यांच्यावर असेल तर अशा अपंगांना एसटी प्रवासामध्ये ७५ टक्के सवलत मिळते. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी हे कायमस्वरूपी ओळखपत्र असून १८ खाली व्यक्तींनी दर पाच वर्षांनी हे ओळखपत्र नवीन घ्यावेत, अशी अट आहे. त्याबाबतचा उल्लेख ओळखपत्रावर आहे. सध्या मात्र शासनाच्या आदर्श सूचनांना हरताळ फासत ओळखपत्र कालबाह्य ठरविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अपंग एसटी प्रवासावेळी हे ओळखपत्र दाखवितात, तेव्हा अनेक वाहक ते नूतनीकरण करून आणा असे सांगतात. याबाबत सातारा आगाराशी संपर्क साधला असता अपंगांच्या ओळखपत्रांवर शिक्के मारून दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अपंग ओळखपत्रांवर शिक्के मारण्यासाठी अपंगांना धावपळ करत एसटी आगार गाठावे लागत आहे. दिसला अपंग, काढ बसमधून बाहेर!अपंग व्यक्ती प्रवास करताना दिसला की ओळखपत्र पाहून खाली उतरविण्याच्या सूचना अनेकवेळा केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब अपंगांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी संबंधित यंत्रणेने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.शिक्क्याने मिटणार अडचणीएसटी प्रशासनाच्या सूचनेनुसार अपंगांना मिळालेल्या ओळखपत्रांवर कायमस्वरूपी असा शिक्का मारण्यात येतो. एसटीच्या आगारात त्यांनी तो मारून घेतल्यास त्यांना प्रवासात सवलत मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही.- नौशाद तांबोळी, आगारप्रमुख, सातारा.नियम काय सांगतो...केंद्र शासनाचे पत्र क्रमांक १६.२१/९७-१३ दि. १ आॅक्टोबर २००४ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार अपंग व्यक्तीस ओळखपत्र देणेबाबत आदेशित केले आहे.१८ वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या अपंगांना हे कायम ओळखपत्र देण्यात येत आहे.१८ वर्षांखालील शारीरिकदृष्ट्या अपंगांनी दर पाच वर्षांनी ओळखपत्र नवीन घेण्यात यावे.ओळखपत्र हरविल्यानंतर दुसरे नवीन ओळखपत्र काढण्याचा नवीन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे व माहिती तसेच त्यासोबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे, व ज्याच्या नावाने देण्यात आले आहे, त्याने ते ठेवावे व वापरावे.