शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या प्रवासाला ‘शिक्क्यांचे’ अडथळे!

By admin | Updated: October 15, 2015 00:31 IST

एसटी कंडक्टरांचा अजब नियम : ओळखपत्र चालत नसल्याचा फतवा

सागर गुजर - सातारा -शासनाचे वाहन म्हणून सर्वसामान्यांसाठी आधार ठरणारी एसटी सध्या अपंगांवर नाराज झाल्याचे चित्र आहे. अपंगांना एसटी प्रवासात सवलत म्हणून देण्यात आलेले ओळखपत्र चालत नसल्याचा अलिखित फतवा काही वाहकांकडून काढला गेला आहे. या ओळखपत्रावर ‘कायमस्वरूपी’ हा शिक्का आणण्याचा अजब कारभार सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार अपंग एसटीच्या सवलतीचा लाभ घेत आहे. अपंग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मिळते. या आधारावर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून अपंगांना एक ओळखपत्र मिळते. अपंगत्व ४० टक्क्यांच्यावर असेल तर अशा अपंगांना एसटी प्रवासामध्ये ७५ टक्के सवलत मिळते. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी हे कायमस्वरूपी ओळखपत्र असून १८ खाली व्यक्तींनी दर पाच वर्षांनी हे ओळखपत्र नवीन घ्यावेत, अशी अट आहे. त्याबाबतचा उल्लेख ओळखपत्रावर आहे. सध्या मात्र शासनाच्या आदर्श सूचनांना हरताळ फासत ओळखपत्र कालबाह्य ठरविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अपंग एसटी प्रवासावेळी हे ओळखपत्र दाखवितात, तेव्हा अनेक वाहक ते नूतनीकरण करून आणा असे सांगतात. याबाबत सातारा आगाराशी संपर्क साधला असता अपंगांच्या ओळखपत्रांवर शिक्के मारून दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अपंग ओळखपत्रांवर शिक्के मारण्यासाठी अपंगांना धावपळ करत एसटी आगार गाठावे लागत आहे. दिसला अपंग, काढ बसमधून बाहेर!अपंग व्यक्ती प्रवास करताना दिसला की ओळखपत्र पाहून खाली उतरविण्याच्या सूचना अनेकवेळा केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब अपंगांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी संबंधित यंत्रणेने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.शिक्क्याने मिटणार अडचणीएसटी प्रशासनाच्या सूचनेनुसार अपंगांना मिळालेल्या ओळखपत्रांवर कायमस्वरूपी असा शिक्का मारण्यात येतो. एसटीच्या आगारात त्यांनी तो मारून घेतल्यास त्यांना प्रवासात सवलत मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही.- नौशाद तांबोळी, आगारप्रमुख, सातारा.नियम काय सांगतो...केंद्र शासनाचे पत्र क्रमांक १६.२१/९७-१३ दि. १ आॅक्टोबर २००४ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार अपंग व्यक्तीस ओळखपत्र देणेबाबत आदेशित केले आहे.१८ वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या अपंगांना हे कायम ओळखपत्र देण्यात येत आहे.१८ वर्षांखालील शारीरिकदृष्ट्या अपंगांनी दर पाच वर्षांनी ओळखपत्र नवीन घेण्यात यावे.ओळखपत्र हरविल्यानंतर दुसरे नवीन ओळखपत्र काढण्याचा नवीन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे व माहिती तसेच त्यासोबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे, व ज्याच्या नावाने देण्यात आले आहे, त्याने ते ठेवावे व वापरावे.