शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एसटीने गमावले बारा मोहरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाने सर्वत्रच हाहाकार माजविला असून, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठी माणसं बळी पडत आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारीही यातून ...

सातारा : कोरोनाने सर्वत्रच हाहाकार माजविला असून, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठी माणसं बळी पडत आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारीही यातून सुटलेले नाहीत. सातारा विभागातील तब्बल २८६ कर्मचाऱ्यांना या काळात कोरोनाचा संसर्ग झाला होता, तर बारा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याने दसऱ्यापर्यंत एसटीच्या फेऱ्या पूर्णपणे ठप्प होत्या. त्यातूनही परप्रांतीयांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडून येण्याचे काम एसटीने पार पाडले होते. मात्र या सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत एसटीला कधी नव्हे ते नुकसान झाले. कर्मचाऱ्यांना पगार देण्याएवढेही उत्पन्न नसल्याने अनेकदा सरकारकडून मदत घ्यावी लागली होती.

एसटी वाहतुकीला शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याने एसटीला पुन्हा पूर्वीचे दिवस मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केले. सहा-सात महिने कोठेही जाता आले नाही. त्यातच कोरोनाची लाट कमी झाली होती. त्यामुळे गावी जाण्यासाठी नागरिक एसटीकडे वळू लागले होते. त्यामुळे संसर्गाचा धोका असतानाही कर्मचारी कामावर रुजू झाले. मागील नुकसान सोडाच, पण किमान यापुढे तरी कर्मचाऱ्यांचा पगार निघाला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील सर्वच विभाग, आगारांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या शहरांमध्ये गाड्या सोडल्या. त्यामुळे चालक-वाहकांना दोनशे-तीनशे किलोमीटरपर्यंत जावे लागत होते. यामुळे एका फेरीत कित्येक ठिकाणी प्रवासी उतरत व नवे बसत असत. यामुळे बहुधा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास निमंत्रण मिळाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांचा मुंबईतील बेस्टसाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईला विविध विभागातून कर्मचारी पाठविण्याचे फर्मान मध्यवर्ती कार्यालयाकडून सोडण्यात आले. त्याला कर्मचाऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही विभागीय कार्यालयाकडून आदेश असल्याने स्थानिक अधिकारीही काही करू शकत नव्हते.

फलटण आगारावर दु:खाचा डोंगर

सातारा विभागातील तब्बल २८६ कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कौटुंबिक भावनेतील एसटीचे अधिकारी, कर्मचारी दवाखान्यात जाऊन प्रशासनाची भेट घेतात. चांगले उपचार करण्याबाबत विनंती करतात. पण त्यातूनही काही सहकारी सोडून गेले. यामध्ये फलटण आणि खंडाळा आगारातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. फलटण आगारातील दोन वरिष्ठांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. ही घटना कर्मचाऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली.

चौकट

कोरोनायोद्ध्यात समावेश नाही

अत्यावश्यक सेवा म्हणून एसटीकडे पाहिले जाते. निमशासकीय असले तरी एसटी कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारच्या कोरोनायोद्धा या यादीत समावेश नाही. त्यामुळे मदत मिळणेही अवघडच आहे.

कोट :

बेस्ट सेवेसाठी कर्मचारी पाठविण्याचा निर्णय मध्यवर्ती कार्यालयाचा आहे. तो आम्हाला ऐकावाच लागत असला तरीही मी स्वत: याबाबत वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांच्या भावना कळविल्या आहेत.

- सागर पळसले,

विभाग नियंत्रक, सातारा