शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना बाजूला सारून स्वतंत्र फळी !

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

शिवेंद्रराजेंची व्यूहरचना : निवडणूक निकालाचा बोध घेऊन थेट जनतेशी संपर्क साधण्यावर भर--बातमीमागची बातमी...

दत्ता यादव - सातारा  -विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शहरामध्ये मताधिक्य कमी पडले होते. काही स्थानिक नगरसेवकांनी काम केले नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. हे जाणून असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी आता यातून पुन्हा उभारी घेण्यासाठी व बिनकामी नगरसेवकांना शह देण्यासाठी नगरसेवकांच्याच वॉर्डमध्ये स्वयंसेवक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर नसेल ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये १ लाख २७ हजार १४३ मते पडली होती. त्यामध्ये सातारा शहराचा वाटाही चांगला होता. परंतु २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकूण ९७ हजार ९६४ मते पडली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना या निवडणुकीमध्ये अचानक मताधिक्क्य घटल्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना मानणारा वर्ग कमी झाला की काय, अशीही चर्चा सुरू झाली. काही नगरसेवक आपली ठेकेदारी बळकट करण्याच्या प्रयत्नात कामाकडे दुर्लक्ष आणि नेत्यांजवळ पुढे-पुढे करतात. त्यामुळे साहजीकच नेत्यांकडे सर्वसामान्यांचा थेट संपर्क तुटला. त्यातूनही एखादा नागरिक थेट नेत्यांना भेटलाच तर संबंधित वॉर्डमधील नगरसेवकाच्या भुवया उंचवतात. अशा भेटींचा प्रतिष्ठेचा मुद्दा करून नगरसेवकांकडून सर्वसामान्यांची नेहमीच बोळवण केली जाते. त्यामुळे नाराज असलेले नागरिक मग मतपेटीद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात. हीच परिस्थिती सध्या सातारा शहरामध्ये असल्यामुळे नगरसेवकांना चेकमेट देण्यासाठीच ही व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे.