शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीची सांगड!

By admin | Updated: December 15, 2015 00:54 IST

किसान सशक्तीकरण अभियान : जमिनीचा ऱ्हास थांबवून आधुनिक शेती करण्याचे आवाहन

मसूर : प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने अखील भारतीय किसान सशक्तीकरण अभियानाचा समारोप मसूर मध्ये झाला. अध्यक्षस्थानी पुणे मिरा सोसायटीच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका उषा बहेणजी होत्या. या माध्यमातून मसूरमध्ये अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीची सांगड घालण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंंगराव जगदाळे, काँगे्रसचे जिल्हासरचिटणीस नंदकुमार जगदाळे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सैदापूरचे कृषी मंडलाधिकारी श्रीनिवास खबाले, विष्णूभाईजी, श्रीकांत जिरंगे, सह्याद्रीचे संचालक संजय जगदाळे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, उदयोजक दिलीपराज लंगडे उपस्थित होते.मानसिंगराव जगदाळे यांनी मसूरच्या ब्रम्हकुमारी केंद्राचे सामाजिक , शेतीविषयक उपक्रम मोलाचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अबलंबून शाश्वत शेती करण्याची गरज आहे,’ असे सांगितले.नंदकुमार जगदाळे म्हणाले ‘निसर्गाच्या चक्रात अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. रासायनिक शेतीने जमिनीचा ऱ्हास होत चालला आहे. जमीन नापीक बनत आहे. प्रायोगिक शेतीतून सशक्त सकस अन्न तयार होऊन भावी पिढीही निरोगी निकोप बनेल. अशा या प्रायोगिक शेती बिजाचा वटवृक्ष व्हावा.’ मनीषा बहेनजी म्हणाल्या, ‘गेल्या पंधरा दिवसांत ८० गावांत हे अभियान पोहोचविण्यात यश आले. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्ती कार्यक्रम, शेती विषयक जागृती, सेंद्रिय व प्रायोगिक शेतीचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे.’ विष्णूभाई म्हणाले, ‘रासायनिक विषारी औषधांमुळे जमीन नापीक होते. दूषित अन्न व पाणी यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचा परिणाम आयुमर्यादेवर होत आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करा. शेती नापीक होण्यापासून वाचवा त्यासाठी या जनजागृतीच्या कार्यक्रमाचा लाभ घेत योगाचा आधार घेऊन कमी खर्चात जास्त उत्पादन पिकवा.’ कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी कृषीप्रधान देशात शेतीकडेच दुर्लक्ष होत असून, त्यांच्यात जागृती होण्याची नितांत गरज असल्याचे सांगून म्हणाले, ‘कृषी विभाग व विश्वाविद्यालयाच्या समन्वयातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांमार्फत पोहोचवून शेतकरी स्वंयपूर्ण बनण्यासाठी कृषीविभाग सर्वोतोपरी सहकार्य करेल.’डॉ. वैशालीदेवी यांनी ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या कार्याचा परीचय करून दिला.मसूर केंद्राच्या संचालिका शैलजा बहेनजी यांनी स्वागत केले. सुलभाबहेनजी यांनी सूत्रसंचालन केले. कऱ्हाड सेवा केंद्राच्या संचालिका उषा बहेनजी यांनी आभार मानले.कार्यक्रमास शैलजा दिदी, बजरंग भाई, मुक्ता बहेणजी, योगिनी बहेणजी, शिवाणी बहेणजी, कांचन बहेणजी, शकुंतला बहेणजी, संतोषभाई , अभिजितभाई, विलासभाई, सचिनभाई,यांच्यासह जिल्ह्यातील केंद्र संचालिका, बहेण , भार्इंजी उपस्थित होते. (वार्ताहर)