शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीची सांगड!

By admin | Updated: December 15, 2015 00:54 IST

किसान सशक्तीकरण अभियान : जमिनीचा ऱ्हास थांबवून आधुनिक शेती करण्याचे आवाहन

मसूर : प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने अखील भारतीय किसान सशक्तीकरण अभियानाचा समारोप मसूर मध्ये झाला. अध्यक्षस्थानी पुणे मिरा सोसायटीच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका उषा बहेणजी होत्या. या माध्यमातून मसूरमध्ये अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीची सांगड घालण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंंगराव जगदाळे, काँगे्रसचे जिल्हासरचिटणीस नंदकुमार जगदाळे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सैदापूरचे कृषी मंडलाधिकारी श्रीनिवास खबाले, विष्णूभाईजी, श्रीकांत जिरंगे, सह्याद्रीचे संचालक संजय जगदाळे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, उदयोजक दिलीपराज लंगडे उपस्थित होते.मानसिंगराव जगदाळे यांनी मसूरच्या ब्रम्हकुमारी केंद्राचे सामाजिक , शेतीविषयक उपक्रम मोलाचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अबलंबून शाश्वत शेती करण्याची गरज आहे,’ असे सांगितले.नंदकुमार जगदाळे म्हणाले ‘निसर्गाच्या चक्रात अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. रासायनिक शेतीने जमिनीचा ऱ्हास होत चालला आहे. जमीन नापीक बनत आहे. प्रायोगिक शेतीतून सशक्त सकस अन्न तयार होऊन भावी पिढीही निरोगी निकोप बनेल. अशा या प्रायोगिक शेती बिजाचा वटवृक्ष व्हावा.’ मनीषा बहेनजी म्हणाल्या, ‘गेल्या पंधरा दिवसांत ८० गावांत हे अभियान पोहोचविण्यात यश आले. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्ती कार्यक्रम, शेती विषयक जागृती, सेंद्रिय व प्रायोगिक शेतीचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे.’ विष्णूभाई म्हणाले, ‘रासायनिक विषारी औषधांमुळे जमीन नापीक होते. दूषित अन्न व पाणी यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचा परिणाम आयुमर्यादेवर होत आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करा. शेती नापीक होण्यापासून वाचवा त्यासाठी या जनजागृतीच्या कार्यक्रमाचा लाभ घेत योगाचा आधार घेऊन कमी खर्चात जास्त उत्पादन पिकवा.’ कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी कृषीप्रधान देशात शेतीकडेच दुर्लक्ष होत असून, त्यांच्यात जागृती होण्याची नितांत गरज असल्याचे सांगून म्हणाले, ‘कृषी विभाग व विश्वाविद्यालयाच्या समन्वयातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांमार्फत पोहोचवून शेतकरी स्वंयपूर्ण बनण्यासाठी कृषीविभाग सर्वोतोपरी सहकार्य करेल.’डॉ. वैशालीदेवी यांनी ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या कार्याचा परीचय करून दिला.मसूर केंद्राच्या संचालिका शैलजा बहेनजी यांनी स्वागत केले. सुलभाबहेनजी यांनी सूत्रसंचालन केले. कऱ्हाड सेवा केंद्राच्या संचालिका उषा बहेनजी यांनी आभार मानले.कार्यक्रमास शैलजा दिदी, बजरंग भाई, मुक्ता बहेणजी, योगिनी बहेणजी, शिवाणी बहेणजी, कांचन बहेणजी, शकुंतला बहेणजी, संतोषभाई , अभिजितभाई, विलासभाई, सचिनभाई,यांच्यासह जिल्ह्यातील केंद्र संचालिका, बहेण , भार्इंजी उपस्थित होते. (वार्ताहर)