शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मसाला उतरला काढ्यात; दरही वाढला झटक्यात.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना आला आणि मसाल्याचा वापर औषध म्हणून काढ्याच्या रूपाने होऊ लागला. त्यातच सध्या वाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना आला आणि मसाल्याचा वापर औषध म्हणून काढ्याच्या रूपाने होऊ लागला. त्यातच सध्या वाहतूक खर्च वाढणे, उत्पादन कमी राहणे आदी कारणाने मसाला दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे जेवणाची चवही महागली आहे.

मागील सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचं संकट आहे. यामुळे विविध साहित्यांचे दर वाढले आहेत. पालेभाज्याही भाव खाऊ लागल्यात. याच काळात मसाल्याचा काढा करून तयार होणारे औषध पिण्याचा प्रकार पुढे आला. त्यासाठी घरात असणाऱ्या विविध मसाल्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर घरात स्वयंपाकासाठी मसाले हे महत्त्वाचेच ठरतात; पण आता हेच मसाले दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरातील चवही महाग करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच येत्या काही दिवसांत गौरी, गणपती, नवरात्रौत्सव, दिवाळी हे सण येत आहेत. त्यामुळे मसाल्याच्या किमती आणखी वाढू शकतात.

.........................

असे वाढले दर...

जुने दर नवे दर

रामपत्री ९०० ९००

बदामफूल ८०० १२००

जिरे १६० १६०

काळी मिरी ४२० ५४०

नाकेश्वरी १२०० १८००

जायपत्री २००० २३००

मोहरी ६० ८०

तमालपत्री ६५ ६५

लवंग ४५० ७००

.....................................

महागाई पाठ सोडेना...

मसाल्याकडे औषध गुणधर्म म्हणून पाहिले जाते. या मसाल्यांचा वापर स्वयंपाकात करावाच लागतो. त्याशिवाय जेवण रुचकर होत नाही. त्यातच सणांच्या काळात मसाल्याचा वापर अधिक होतो; पण गेल्या काही दिवसांत मसाल्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोरोना काळात वाढलेली महागाई पाठ काय सोडेना? अशी स्थिती आहे.

- पुष्पा पाटील, गृहिणी .

.............................................

कोरोनाचे संकट असल्याने आजही मसाल्यांचा काढा घेण्याचे प्रमाण आहे. खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठीही मसाले लागतात; पण सध्या मसाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे स्वयंपाकाची चवच कमी झाली आहे. येणाऱ्या काळात सण अधिक आहेत. त्यामुळे मसाल्यांची मागणी वाढून आणखी दर वाढणार आहेत.

- सरोज नरळे, गृहिणी.

....................................................

म्हणून वाढले मसाल्याचे दर...

मसाल्याचे पदार्थ अनेक राज्यात पिकवले जातात. तेथून आयात करण्यात येते. तेथे उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. परिणामी, गेल्या काही महिन्यांत अनेक मसाल्यांचे दर वाढलेले आहेत.

- मोहसीन बागवान, आर.एम. ट्रेडर्स, सातारा.

............................................

मसाल्यांचा वापर स्वयंपाकासाठी होतो; पण गेल्या वर्षभरात कोरोनामुळे औषध काढा म्हणून मसाल्यांना मागणी वाढली. त्यातच बाहेरून येणारे मसाल्यांची आयात कमी झाल्याने दरावर परिणाम झाला आहे.

- शांताराम पवार, दुकानदार .

..............................................................