शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

दारूबंदीच्या फेरविचारासाठी मेढ्यात आज विशेष ग्रामसभा

By admin | Updated: August 25, 2014 22:52 IST

अजब तर्कशास्त्र : म्हणे अवैध मार्गाने दारू येतेच, तर दुकाने बंद का?

मेढा : दारूमुक्त तालुका असा लौकिक प्राप्त करूनही जावळी तालुक्यात अवैध मार्गाने दारू येतच आहे, तर मग वैध दुकाने का नकोत, असा अजब सवाल उपस्थित करून काहीजणांनी वैध दारू दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि. २६) विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून, दारूबंदीच्या समर्थकांचा त्याला तीव्र विरोध आहे.दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते आणि रणरागिणींच्या अथक प्रयत्नांतून पाच गावांतील १३ दारू दुकाने बंद करून जावळी तालुक्याने इतिहास रचला. त्यानंतर अवैधरीत्या दारू येत राहिली ती पोलीस, उत्पादनशुल्क विभाग आणि काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे. दारूबंदीचा निर्णय मात्र ग्रामसभेत झालेला होता. आता अवैध दारूविक्री सुरू आहेच, तर वैध दुकाने का नकोत, असा सवाल उपस्थित करीत ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. कधी नव्हे ते ग्रामसभेची सूचना देणारे फ्लेक्स फलक झळकले आहेत. महिलांच्या मतदानाने झालेली दारूबंदी उठविण्यासाठी बोलावलेली ही विशेष ग्रामसभाच बेकायदेशीर असून, त्याविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दारूबंदी महिला कमिटी आणि व्यसनमुक्त युवक संघाने म्हटले आहे. असे असले तरी ग्रामस्थ, महिलांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून दारूबंदीचा इतिहास कायम ठेवावा, असे आवाहनही संघाने केले आहे.नऊ डिसेंबर २००७ रोजी मेढा येथे महिलांचे मतदान होऊन मेढा गावातील दोन देशी दारू दुकाने, दोन बिअर बार, एक बिअर शॉपी, एक ताडी-माडी दुकान बंद करण्यात आले. यानंतर दारूविक्रेत्यांनी मुंबई येथे उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्तांकडून २० मार्च २००८ रोजी दारूबंदीला स्थगिती मिळविली. यानंतर मेढा येथील दारूदुकाने सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मेढा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शंखनाद आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्यासमवेत मेढ्यातील महिलांचे शिष्टमंडळ घेऊन व्यसनमुक्त संघाचे कार्यकर्ते उत्पादनशुल्क मंत्री गणेश नाईक यांना भेटले. परंतु त्यांनी आयुक्तांच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर सातारा येथील कार्यक्रमास येणाऱ्या शरद पवार यांना काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन महिलांनी जाहीर केले. या आंदोलनाचा धसका घेऊन ११ एप्रिल २००८ रोजी दारू दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाला गणेश नाईक यांनी स्थगिती दिली व मेढ्यातील दारूबंदी दुसऱ्यांदा यशस्वी झाली.‘पिचलेल्या महिला वारंवार आंदोलने करू शकत नाहीत. परंतु भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्र येऊन नतद्रष्टांनी स्वार्थासाठी दारू दुकाने सुरू करण्याचा चालविलेला प्रयत्न हाणून पाडावा,’ असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाने केले आहे. (प्रतिनिधी)दारूबंदी होऊनही अवैध मार्गाने दारू येतच आहे, तर दारूबंदीचा फेरविचार करण्यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनीच ग्रामसभेत केली होती. दारूबंदीला वर्ष झाल्यानंतर ती कायम ठेवायची नसेल, तर ग्रामसभाच घ्यावी लागते. त्यामुळे ही सभा बोलावण्यात आली आहे. दारूबंदी उठवायची की कायम राखायची हा निर्णय ग्रामस्थांनीच घ्यायचा आहे. दोन्ही पर्याय ग्रामस्थांसमोर खुले असतील. त्यातून त्यांनीच निवड करावी.- सुजीत जवळ, सरपंच, मेढा