शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सोयाबीन खाद्यतेल दरात वाढ : भाजीपाल्याची आवक कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी ...

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी १०० रुपये वाढ झाली तर उन्हाळा शेंगदाणा आल्याने शेंगतेलाच्या भावात थोडा उतार आला आहे. त्याचबरोबर पावसामुळे शेतातून बाहेर भाजीपाला काढणे अवघड झाल्याने आवक कमी होत चालली आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची १३१ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १०० ते १२० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,५०० रुपयांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. या दोन्हीचे भाव मागील १५ दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र, वाटाणा उतरला आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. मात्र, मागील आठवड्यात सोयाबीन व पामतेल दरात थोडी वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २,३५० ते २,४५० रुपयांना मिळत आहे. शेंगदाणा २,३०० ते २,४००, सोयाबीनचा डबा २,३५० ते २,४०० आणि पामतेलचा डबा १,९५० रुपयांना मिळत आहे. सोयाबीन, पामतेल पाऊचमागेही वाढ झाली आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंबा, डाळिंब, पपई, सफरचंदाची आवक होत होती. पण, रविवारी फक्त डाळिंबाची ६ क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले.

कोबी स्वस्तच...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ७० आणि बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव मिळाला. भेंडीला १५० ते २००, शेवगा शेंग ३०० ते ४००, पावटा २०० ते २५० आणि गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया...

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनने खाद्यतेल खरेदी वाढवली. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे सोयाबीन व पामतेल दरात वाढ झाली आहे. आजही आपण ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

मागील आठवड्यापासून पाऊस आहे. सातारा, जावळी, कऱ्हाड यासारख्या तालुक्यांतून भाजीपाला येत आहे. पण, पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला चांगला बघून खरेदी करावा लागतो.

- शांताराम काळे, ग्राहक

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यातून बाहेर काढून भाजीपाला बाजार समितीत आणावा लागतो. तरीही कोबी, टोमॅटो तसेच इतर भाज्यांना म्हणावा तसा दर मिळत नाही. पाऊस आणि दर नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. - तुकाराम पाटील, शेतकरी

..........................................................................................................................................................................................