शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

सोयाबीन खाद्यतेल दरात वाढ : भाजीपाल्याची आवक कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी ...

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी १०० रुपये वाढ झाली तर उन्हाळा शेंगदाणा आल्याने शेंगतेलाच्या भावात थोडा उतार आला आहे. त्याचबरोबर पावसामुळे शेतातून बाहेर भाजीपाला काढणे अवघड झाल्याने आवक कमी होत चालली आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची १३१ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १०० ते १२० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,५०० रुपयांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. या दोन्हीचे भाव मागील १५ दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र, वाटाणा उतरला आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. मात्र, मागील आठवड्यात सोयाबीन व पामतेल दरात थोडी वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २,३५० ते २,४५० रुपयांना मिळत आहे. शेंगदाणा २,३०० ते २,४००, सोयाबीनचा डबा २,३५० ते २,४०० आणि पामतेलचा डबा १,९५० रुपयांना मिळत आहे. सोयाबीन, पामतेल पाऊचमागेही वाढ झाली आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंबा, डाळिंब, पपई, सफरचंदाची आवक होत होती. पण, रविवारी फक्त डाळिंबाची ६ क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले.

कोबी स्वस्तच...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ७० आणि बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव मिळाला. भेंडीला १५० ते २००, शेवगा शेंग ३०० ते ४००, पावटा २०० ते २५० आणि गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया...

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनने खाद्यतेल खरेदी वाढवली. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे सोयाबीन व पामतेल दरात वाढ झाली आहे. आजही आपण ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

मागील आठवड्यापासून पाऊस आहे. सातारा, जावळी, कऱ्हाड यासारख्या तालुक्यांतून भाजीपाला येत आहे. पण, पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला चांगला बघून खरेदी करावा लागतो.

- शांताराम काळे, ग्राहक

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यातून बाहेर काढून भाजीपाला बाजार समितीत आणावा लागतो. तरीही कोबी, टोमॅटो तसेच इतर भाज्यांना म्हणावा तसा दर मिळत नाही. पाऊस आणि दर नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. - तुकाराम पाटील, शेतकरी

..........................................................................................................................................................................................