शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

सोयाबीन खाद्यतेल दरात वाढ : भाजीपाल्याची आवक कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी ...

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी १०० रुपये वाढ झाली तर उन्हाळा शेंगदाणा आल्याने शेंगतेलाच्या भावात थोडा उतार आला आहे. त्याचबरोबर पावसामुळे शेतातून बाहेर भाजीपाला काढणे अवघड झाल्याने आवक कमी होत चालली आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची १३१ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १०० ते १२० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,५०० रुपयांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. या दोन्हीचे भाव मागील १५ दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र, वाटाणा उतरला आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. मात्र, मागील आठवड्यात सोयाबीन व पामतेल दरात थोडी वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २,३५० ते २,४५० रुपयांना मिळत आहे. शेंगदाणा २,३०० ते २,४००, सोयाबीनचा डबा २,३५० ते २,४०० आणि पामतेलचा डबा १,९५० रुपयांना मिळत आहे. सोयाबीन, पामतेल पाऊचमागेही वाढ झाली आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंबा, डाळिंब, पपई, सफरचंदाची आवक होत होती. पण, रविवारी फक्त डाळिंबाची ६ क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले.

कोबी स्वस्तच...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ७० आणि बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव मिळाला. भेंडीला १५० ते २००, शेवगा शेंग ३०० ते ४००, पावटा २०० ते २५० आणि गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया...

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनने खाद्यतेल खरेदी वाढवली. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे सोयाबीन व पामतेल दरात वाढ झाली आहे. आजही आपण ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

मागील आठवड्यापासून पाऊस आहे. सातारा, जावळी, कऱ्हाड यासारख्या तालुक्यांतून भाजीपाला येत आहे. पण, पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला चांगला बघून खरेदी करावा लागतो.

- शांताराम काळे, ग्राहक

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यातून बाहेर काढून भाजीपाला बाजार समितीत आणावा लागतो. तरीही कोबी, टोमॅटो तसेच इतर भाज्यांना म्हणावा तसा दर मिळत नाही. पाऊस आणि दर नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. - तुकाराम पाटील, शेतकरी

..........................................................................................................................................................................................