शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

सोयाबीन खाद्यतेल दरात वाढ : भाजीपाल्याची आवक कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी ...

सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी १०० रुपये वाढ झाली तर उन्हाळा शेंगदाणा आल्याने शेंगतेलाच्या भावात थोडा उतार आला आहे. त्याचबरोबर पावसामुळे शेतातून बाहेर भाजीपाला काढणे अवघड झाल्याने आवक कमी होत चालली आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची १३१ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १०० ते १२० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,५०० रुपयांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. या दोन्हीचे भाव मागील १५ दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र, वाटाणा उतरला आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. मात्र, मागील आठवड्यात सोयाबीन व पामतेल दरात थोडी वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २,३५० ते २,४५० रुपयांना मिळत आहे. शेंगदाणा २,३०० ते २,४००, सोयाबीनचा डबा २,३५० ते २,४०० आणि पामतेलचा डबा १,९५० रुपयांना मिळत आहे. सोयाबीन, पामतेल पाऊचमागेही वाढ झाली आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत आंबा, डाळिंब, पपई, सफरचंदाची आवक होत होती. पण, रविवारी फक्त डाळिंबाची ६ क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले.

कोबी स्वस्तच...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ७० आणि बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव मिळाला. भेंडीला १५० ते २००, शेवगा शेंग ३०० ते ४००, पावटा २०० ते २५० आणि गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया...

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनने खाद्यतेल खरेदी वाढवली. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे सोयाबीन व पामतेल दरात वाढ झाली आहे. आजही आपण ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

मागील आठवड्यापासून पाऊस आहे. सातारा, जावळी, कऱ्हाड यासारख्या तालुक्यांतून भाजीपाला येत आहे. पण, पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला चांगला बघून खरेदी करावा लागतो.

- शांताराम काळे, ग्राहक

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यातून बाहेर काढून भाजीपाला बाजार समितीत आणावा लागतो. तरीही कोबी, टोमॅटो तसेच इतर भाज्यांना म्हणावा तसा दर मिळत नाही. पाऊस आणि दर नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. - तुकाराम पाटील, शेतकरी

..........................................................................................................................................................................................