शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक ऊर्जेचा स्रोत गाभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो. प्रत्येकजण त्याच्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो. मंदिरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गाभारा. ...

हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो. प्रत्येकजण त्याच्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो. मंदिरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गाभारा. मुख्य देवतेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जायचे असेल तर छोट्या दरवाजातून मान वाकवून आत जावे लागते. तेथेच आपल्यातील अहंकार, ‘मी’ पण गळून पडते अन् आपण देवाच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो, असे काहींचे म्हणणे आहे.

हे त्यांच्या विचारातून खरेही असेल. पण त्याला विज्ञानाचाही आधार आहे. आपल्याकडील शिवालयांमध्ये शिवलिंग असलेला गाभारा छोटा असतो अन् आत पायऱ्या उतरुन जावे लागते. त्यामुळे आतील वातावरण थंड असते. तसेच मंदिराचा मुख्य कळस हा गाभाऱ्यावर असतो. छोट्या जागेच्या मधोमध उंचच उंच शिखर आणि कळस असतो. त्याची रचना आतील बाजूस मोकळी असते. गाभाऱ्याच्या केंद्रस्थानी मूर्ती आणि त्याच्या शेजारी आपण बसलेलो असतो. त्यामुळे एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तेथे बसल्यानंतर आपल्याला शांती मिळते आणि मंदिरातील घंटा वाजल्यानंतर मन आणखीन आनंदीत होते.

या वास्तूकलेचा मन:शांती, ध्यान, साधना केंद्रांमध्ये वापर केलेला असतो. अशाठिकाणी ध्यान करताना कसलाही अडथळा येऊ नये, मन:शांती मिळावी यासाठी छोट्या-छोट्या खोल्या बांधलेल्या असतात. त्यामध्ये एकावेळी एकच व्यक्ती बसू शकते. त्यावरही शिखर आणि कळस बसवलेला असतो.

कोट :

प्रपंचातील संकटे, अडीअडचणी यातून क्षणभर का होईना मनाला आनंद देणारी असते. कुणीतरी माझ्या पाठीशी आहे, अशी भावना निर्माण करणारी आपली मंदिर संस्कृती आहे. आनंद, समाधानासाठी, मंदिरातील गाभाऱ्याची अनुभूती नक्की घ्यायला हवी.

- महेश स्वामी, सातारा

चौकट :

बाहेर रखरखतं ऊन अन्...

ऊन्हाळ्यात रखरखत्या ऊन्हातून कित्येक किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे आपण त्रासून जातो. पण अशाच एखाद्या मंदिरात जाऊन काही क्षण गाभाऱ्यात बसलो तर बाहेरचं सारं विसरून जातो. हे केवळ अप्रतिम वास्तू कलेमुळेच शक्य आहे. याचा अनुभव अनेकदा घेतला आहे, अशा भावना प्रशांत नागुरे यांनी व्यक्त केल्या.