शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बावधनमध्ये घुमला ‘चांगभलं’चा गजर

By admin | Updated: March 17, 2017 23:28 IST

बगाड यात्रा उत्साहात : देशभरातील लाखो भाविकांची हजेरी; उत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा

कवठे/पसरणी : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या (ता. वाई) काळभैरवनाथाची बगाड यात्रा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. बावधन बगाड यात्रा ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी भव्य यात्रा आहे. या यात्रेसाठी राज्यासह देशभरातील भाविक बावधन येथे दाखल झाले होते. होळी पौर्णिमेला भैरवनाथ मंदिरात कौल लावून यंदाचा बगाड घेण्याचा मान युवराज ठोंबरे यांना मिळाला.ओझर्डे येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या सोनेश्वर या ठिकाणापासून बगाड यात्रेस प्रारंभ झाला. भरभक्कम व पूर्णत: लाकडी असलेला हा बगाड रथ सहा बैलजोड्यांच्या साह्याने ओढण्यात आला. ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर झाल्याबरोबर एकावेळी हे सर्व बैल आपल्या ताकदीनिशी गाडा ओढत होते. ठराविक अंतरावर बैल बदलून नव्या दमाच्या बैलांच्या साह्याने सायंकाळी ६.३० च्या दरम्यान बगाडाने बावधन गावात प्रवेश केला.सर्व स्थानिक ग्रामस्थ पांढऱ्या पोशाखात होते. बगाड गावात पोहोचताच बगाडाचे रिंगण पूर्ण करून बगाड्यास खाली उतरवून देवाचा प्रसाद दिला गेला व बगाड यात्रेची सांगता करण्यातआली. (वार्ताहर)रथाला दोन दगडी चाके; ४० फुटांचे शीडसुमारे तीनशे वर्षांपासून बगाड प्रथा सुरू आहे. गावातील थोरल्या विहिरीत पाण्याखाली असलेले बगाड साहित्य बाहेर काढून त्यापासून बगाड गाडा तयार केला जातो. या रथाची दोन दगडी चाके १० फूट लांब लाकडी कण्याने जोडली जातात. यावर लाकडी वाघल्या वसवून त्यावर मधोमध १८ फूट उंच कण्यास ४० फूट लांबीच्या कळकाचे शीड बांधले जाते व त्यास अग्रभागी बगाड्यास टांगले जाते.रथ ओढणाऱ्या बैलांवर लाखोंचा खर्चबगाड यात्रेत शेतकरी वर्गाचे लक्ष पूर्णत: बैलांवर असते. कोणाच्या बैलाने किती चांगल्या पद्धतीने रथ ओढला याची चर्चा महिनाभर परिसरात असते. आपल्या बैलामुळे आपले नाव चर्चेत यावे यासाठी लाखाच्या आसपास किंमत असलेले खिलारी बैल खास बगाडासाठी जतन केले जातात. पोटच्या पोरासारखे बैलांना दोन महिने आधीपासून खुराक, रतीब देऊन रथ ओढण्याऱ्या लाकडी ओंडक्यास जुंपून बैलांचा महिनाभर सराव घेतला जातो.पार्किंग व्यवस्था व भाविकांसाठी पाणीपुरवठाबावधन येथे मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे पार्किंग तळ तयार करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यास पोलिसांना यश आले. बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरून त्यावरून सूचना देण्यात येत होत्या. पाणीपुरवठा करण्यासाठी जागोजागी वाहने असल्याने यात्रेकरूंची तृष्णा भागविली जात होती.