शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

बावधनमध्ये घुमला ‘चांगभलं’चा गजर

By admin | Updated: March 17, 2017 23:28 IST

बगाड यात्रा उत्साहात : देशभरातील लाखो भाविकांची हजेरी; उत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा

कवठे/पसरणी : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या (ता. वाई) काळभैरवनाथाची बगाड यात्रा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. बावधन बगाड यात्रा ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी भव्य यात्रा आहे. या यात्रेसाठी राज्यासह देशभरातील भाविक बावधन येथे दाखल झाले होते. होळी पौर्णिमेला भैरवनाथ मंदिरात कौल लावून यंदाचा बगाड घेण्याचा मान युवराज ठोंबरे यांना मिळाला.ओझर्डे येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या सोनेश्वर या ठिकाणापासून बगाड यात्रेस प्रारंभ झाला. भरभक्कम व पूर्णत: लाकडी असलेला हा बगाड रथ सहा बैलजोड्यांच्या साह्याने ओढण्यात आला. ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर झाल्याबरोबर एकावेळी हे सर्व बैल आपल्या ताकदीनिशी गाडा ओढत होते. ठराविक अंतरावर बैल बदलून नव्या दमाच्या बैलांच्या साह्याने सायंकाळी ६.३० च्या दरम्यान बगाडाने बावधन गावात प्रवेश केला.सर्व स्थानिक ग्रामस्थ पांढऱ्या पोशाखात होते. बगाड गावात पोहोचताच बगाडाचे रिंगण पूर्ण करून बगाड्यास खाली उतरवून देवाचा प्रसाद दिला गेला व बगाड यात्रेची सांगता करण्यातआली. (वार्ताहर)रथाला दोन दगडी चाके; ४० फुटांचे शीडसुमारे तीनशे वर्षांपासून बगाड प्रथा सुरू आहे. गावातील थोरल्या विहिरीत पाण्याखाली असलेले बगाड साहित्य बाहेर काढून त्यापासून बगाड गाडा तयार केला जातो. या रथाची दोन दगडी चाके १० फूट लांब लाकडी कण्याने जोडली जातात. यावर लाकडी वाघल्या वसवून त्यावर मधोमध १८ फूट उंच कण्यास ४० फूट लांबीच्या कळकाचे शीड बांधले जाते व त्यास अग्रभागी बगाड्यास टांगले जाते.रथ ओढणाऱ्या बैलांवर लाखोंचा खर्चबगाड यात्रेत शेतकरी वर्गाचे लक्ष पूर्णत: बैलांवर असते. कोणाच्या बैलाने किती चांगल्या पद्धतीने रथ ओढला याची चर्चा महिनाभर परिसरात असते. आपल्या बैलामुळे आपले नाव चर्चेत यावे यासाठी लाखाच्या आसपास किंमत असलेले खिलारी बैल खास बगाडासाठी जतन केले जातात. पोटच्या पोरासारखे बैलांना दोन महिने आधीपासून खुराक, रतीब देऊन रथ ओढण्याऱ्या लाकडी ओंडक्यास जुंपून बैलांचा महिनाभर सराव घेतला जातो.पार्किंग व्यवस्था व भाविकांसाठी पाणीपुरवठाबावधन येथे मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे पार्किंग तळ तयार करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यास पोलिसांना यश आले. बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरून त्यावरून सूचना देण्यात येत होत्या. पाणीपुरवठा करण्यासाठी जागोजागी वाहने असल्याने यात्रेकरूंची तृष्णा भागविली जात होती.