शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

कधी लेफ्ट तर कधी राईट;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहरातील काही रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जात आहे. या मनमानीचा सर्वसामान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील काही रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जात आहे. या मनमानीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत असून, पैशांवरून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये खटकेदेखील उडू लागले आहेत.

लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला तसाच रिक्षाचालकांनादेखील बसला. चाके थांबल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर रिक्षा पुन्हा धावू लागली. तोवर इंधनाचे दर गगनाला भिडले आणि पुन्हा एकदा रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले. या संकटातून स्वत:ला सावरण्यासाठी शहरातील काही रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने भाडे आकारणी सुरू केली आहे.

रिक्षा प्रवासासाठी दहा रुपयांच्या जागी वीस रुपये, तर पन्नास रुपयांच्या ऐवजी शंभर रुपये आकारले जात आहेत. काहीजण नवख्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. बऱ्याचदा पैसे देण्यावरून वादविवादही होतात. अखेर शेवटी प्रवाशांनाच नमते घ्यावे लागते. शहरातील काही रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका इतर रिक्षाचालक व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी रिक्षाचालकांनी प्रवास भाडे नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

(चौकट)

या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी

बस स्थानक : मध्यवर्ती बसस्थानकात एखादा नवखा प्रवासी दिसला की, इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी त्याला अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले जाते व आकारले जाते. ‘थोडे पैसे कमी करा’ असे सांगितल्यानंतर काही रिक्षाचालक ‘आम्ही कमीच सांगितलं’ असही उत्तर देतात.

बॉम्बे रेस्टॉरंट चौक : या चौकातून सातारा शहर, संगम माहुली, रेल्वे स्थानक व एमआयडीसीकडे जाणाऱ्या नागरिकांंची संख्या अधिक असते. या ठिकाणीदेखील काही रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळते. केवळ वेळ वाचावा म्हणून प्रवाशांना अधिकचे पैसे द्यावे लागतात.

पोवई नाका : आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाक्यावर रिक्षाचालकांची सतत वर्दळ असते. या ठिकाणाहून पूर्वी राजवाड्याला जाण्यासाठी ३० ते ४० रुपये आकारले जायचे. आता साठी ६० ते ७० रुपये आकारले जातात. इतके पैसे का? असं विचारलं तर पेट्रोल महाग झाल्याचे रिक्षाचालक सांगतात.

(कोट)

प्रवाशांना नाहक त्रास

शहरातील काही रिक्षाचालक नियमाप्रमाणे भाडे आकारतात. मात्र, काही जणांकडून प्रवासासाठी जास्त पैसे घेतले जातात. रिक्षाचालकांची कृत्रिम दरवाढ सर्वसामान्यांना न परवडणारी आहे.

- विशाल जगताप, सातारा

(कोट)

महागाई, इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी जास्त प्रमाणात प्रवासभाडे टाकू नये. भाडे आकारताना सर्वसामान्यांचादेखील विचार करावा.

- नीलिमा पाटील, सातारा

(चौकट)

मनमानी भाडे

- पूर्वी बसस्थानक ते राजवाडा प्रवासासाठी एका व्यक्तीकडून दहा रुपये रिक्षा भाडे घेतले जात होते ते आता वीस रुपये झाले आहे.

- एका व्यक्तिला बसस्थानकावरून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जायचे झाल्यास आता पन्नास नव्हे, तर शंभर रुपये मोजावे लागतात.

- काही रिक्षाचालकांकडून दुप्पट प्रवास भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत.

(कोट)

रिक्षा चालकांनी नियमाप्रमाणे भाडे आकारणी करावी. चुकीच्या पद्धतीने भाडे आकारणी केल्यास अथवा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी लागेल.

- विठ्ठल शेलार

सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा